चंद्रपूर
Tag: चंद्रपूर
चंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे
मनोहर सप्रे त्या वेळेस तीस-बत्तीस वर्षांचे असतील, ते एके दिवशी मुलांसोबत जंगलात फिरत असताना, मुलांनी रस्त्यालगतचा एक लाकडी ओंडका उचलला. सप्रे यांना त्या लाकडात आकार दिसला! त्यांनी ते लाकूड घरी आणले. त्यांनी त्या लाकडाला कल्पकतेने थोडा आकार देऊन, त्यातून एक शिल्प साकारले - ‘आईचे व मुलाचे’! सप्रे यांना ते ‘जिवंत झालेले’ शिल्प खूप आवडले. झाले! सप्रे यांना मार्ग सापडला. ते त्यांचे पहिलेवहिले शिल्प...
अतुल धामणकर – वन्यजीवनाचे भाष्यकार (Atul Dhamankar)
अतुल धामणकर गेली वीस वर्षें जंगलात फिरत आहे. त्याने आयुष्याची तेवीस वर्षे ‘ताडोबा अंधारी व्याघ्रजतन प्रकल्प’ या व भारतातील इतर अभयारण्यांत अभ्यासासाठी घालवली; हरीण...
चंद्रपूरवर ठसा इतिहासाचा
अविभाज्य चांदा जिल्हा अखिल महाराष्ट्रात क्षेत्रफळदृष्ट्या अव्वलस्थानी होता. जिल्ह्यांच्या मध्यभागातून वाहणा-या वैनगंगा नदीला सीमारेषा ठरवून त्या जिल्ह्याचे विभाजन केले गेले. त्यातून वैनगंगेच्या पूर्वेकडील भाग...
चंद्रपूरचा परकोट
चंद्रपुरात शहरासभोवती परकोट आहे. त्याचा पाया गोंड राजवंशातील दहावा परंतु चंद्रपूर येथे राज्य करणारा पहिला राजा खांडक्या बल्लाळशहा याने 1472 च्या सुमारास घातला व...
सोमनाथची जलश्रीमंती!
सोमनाथ म्हणजे दुसरे ‘आनंदवन’च! परंतु ‘आनंदवना’पेक्षा तेथे काही खास आहे. ते म्हणजे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी कल्पकतेने अमलात आणलेल्या उपाययोजना. विकास आमटे यांच्या...
महाराष्ट्र टिकला पाहिजे
महाराष्ट्र टिकला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे असे मला मन:पूर्वक वाटते. ते भाषा आणि विकास या दोन पायांवर शक्य होईल असा मला विश्वास आहे. त्यासाठी भाषा, समाज आणि संस्कृती या तीन घटकांचा नव्या संदर्भात विचार केला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र समितीला ती संधी होती, पण राजकीय दुफळीमुळे त्यांना ते जमले नाही. शिवसेनेचे एकूण महाराष्ट्राबद्दलचे आणि भाषिक राजकारणाबद्दलचे आकलन मर्यादित असल्याने त्यांनी या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा गांभीर्याने विचारच केला नाही. मनसे याबाबत सुरुवातीला आश्वासक वाटली होती. पण राज ठाकरेंचे विदर्भात सार्वमत घ्यावे असे एखादे विधान सोडले तर तो पक्ष (किमान प्रकटपणे) सक्रियपणे विदर्भाचा विचार करतो असे दिसत नाही. प्रतीकात्मक राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन अधिक समग्रपणे महाराष्ट्राचा विचार करायचा तर राज्यांतर्गत सत्तावाटपाचा आणि केंद्र-राज्य संबंधांचाही पुनर्विचार करावा लागेल. अशा अस्मितेला अस्पृश्य न मानणार्या ज्ञानाधिष्ठित चळवळीची महाराष्ट्राला गरज आहे. मी त्याला ‘मराठीकारण’ (मराठीकरण नव्हे) म्हणतो. असे मराठीकारण उभे राहणे आणि पुरोगाम्यांनीही त्यापासून ‘पल्ला न झाडणे’ ही या विचारमंथनाची योग्य निष्पत्ती ठरेल...