ना.ग. गोरे : राजकारण आणि साहित्य

0
48

नारायण गणेश गोरे हे नानासाहेब गोरे म्हणून ओळखले जातात. ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील बहुमोल व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. स्वातंत्र्यसैनिकसमाजवादी नेते आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला आहे. त्यांची निष्ठा समाजवादी विचारधारेशी कायम राहिली. समाजात समतान्याय आणि बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य झोकून दिले. नानासाहेबांचे विचार आणि कार्य हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रियेत मोलाचे मानले जातात.

नानासाहेबांचा जन्म 15 जून 1907 रोजी पुण्यातील एका संस्कारशील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्येतर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, त्यांचा एस.एम. जोशीर.कृ. खाडिलकर आणि व्ही.एम. तारकुंडे यांच्याबरोबर परिचय झाला. त्यांच्या चर्चांतून सामाजिक रूढीजातिभेद आणि सामाजिक अन्यायांस विरोध याबद्दल जागरूकता वाढत गेली. त्यांना आगरकरटिळक आणि गांधी यांच्या विचारांनी प्रभावित केले. त्यांच्यावर मेहेर अली यांचा प्रभाव होता.

त्यांनी पुण्यात युथ लीगची शाखा (1928) उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी युथ लीगच्या माध्यमातून सायमन कमिशनच्या निषेध मोर्चात भाग घेतला. ते स्वातंत्र्य चळवळीत 1929 मध्ये सक्रिय उतरले. निमित्त झाले काँग्रेसची संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा त्यांनी गांधीजींनी पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला. नानासाहेबांना नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यांनी तुरुंगातून सुटल्यावर, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केलेपरंतु त्यांना 1931 मध्ये झालेल्या गव्हर्नर हॉटसनवरच्या गोळीबाराच्या घटनेने कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

त्यांनी नाशिक तुरुंगात असताना, समाजवादी विचार समजून घेतले. त्यांनी मार्क्सलेनिन यांचे ग्रंथ वाचले आणि कम्युनिस्ट विचारांची प्राथमिक माहिती मिळवली. त्यांनी काँग्रेसमध्ये राहून समाजवादी विचारांचा प्रसार केला. काँग्रेसमधील समविचारी नेते एकत्र आले आणि मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना ऑक्टोबर 1934 मध्ये झाली. तिचे आचार्य नरेंद्र देव अध्यक्ष तर जयप्रकाश नारायण सरचिटणीस झाले. नानासाहेब गोरे हे पक्षाचे संस्थापक सदस्य होते.

नानासाहेबांनी गुलबर्गा येथे गणेश उत्सवात (1940) भाषण केले. गुलबर्गा हे त्या वेळी निजाम संस्थानात होते. निजाम सरकारने नानासाहेबांचे भाषण आक्षेपार्ह ठरवून त्यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

समाजवादी पक्षाने राष्ट्र सेवा दलाची स्थापना 1941 मध्ये केली. राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेत नानासाहेबांचा मोठा वाटा होता. राष्ट्र सेवा दल कोणत्याही एका पक्षाचा भाग न ठेवता ती एक स्वायत्त संस्था निर्माण करण्याची योजना आखण्यात आली. नानासाहेब आणि एस.एम. यांनी 1941 नंतर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, समाजवादी पक्षाने काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. नानासाहेब गोरे पश्चिम विभागाचे चिटणीस झाले.

नानासाहेब गोरे यांनी गोवा मुक्तीसंग्रामात हिरिरीने उडी घेतली. त्यांचा 15 ऑगस्ट 1955 रोजी झालेल्या सत्याग्रहात सहभाग होती. त्यांच्याबरोबर शिरुभाऊ लिमयेमधु लिमयेजगन्नाथराव जोशी आणि त्र्यंबक चौधरी हे नेतेदेखील सत्याग्रह करत होते. मोर्च्यावर झालेल्या गोळीबारात अनेक सत्याग्रही हुतात्मे झाले. नेत्यांना बारा वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. त्यांना अगुवादच्या किल्ल्यात कैद करण्यात आले. परंतु त्यांची सुटका एकोणिस महिन्यांनंतर झाली. त्याकरता ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने मध्यस्थी केली.

नानासाहेबांनी स्वतंत्र भारतात 1952 साली रत्नागिरी तर 1962 साली पुणे या दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवलीपरंतु दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला. पुढे, समाजवादी पक्षांत फूट पडून 1965 मध्ये संयुक्त समाजवादी पक्ष व प्रजा समाजवादी पक्ष असे दोन वेगवेगळे पक्ष निर्माण झाले. त्या वेळी एस.एम. जोशी संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले तर नानासाहेब गोरे प्रजा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. दोन मित्र एकमेकांपासून प्रथमच दूर झाले. ते दोन वेगवेगळे पक्ष म्हणून सात वर्षे राहिले. नानासाहेब गोरे राज्यसभेवर निवडून 1970 साली आले आणि त्यांनी विरोधी पक्षाचे खासदार म्हणून जबाबदारी निभावली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी 1972 मध्ये एकत्र येऊन समाजवादी पक्षाची पुनर्बांधणी केली. इंदिरा गांधींनी आणीबाणी 1975 साली लागू केली. त्यांनी या आणीबाणीच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. नानासाहेबांनी संसदेत स्पष्टपणे सांगितले, की आणीबाणीने लोकशाहीचा नाश होत आहे. त्यांनी इंदिरा गांधींच्या धोरणावर प्रखर टीका केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी लोकांना आणीबाणीविरुद्ध उठण्याचे आवाहन केले. रंतु नानासाहेब गोरे व एस.एम. जोशी यांना अटक मात्र झाली नाही.

नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत आणि संवेदनशील लेखक होते. त्यांच्या सीतेचे पोहे’, ‘डायी’, ‘कातळातील झरा यांसारख्या कथांतून मानवी भावनाग्रामीण जीवन आणि कार्यकर्त्यांचे संघर्ष प्रभावीपणे मांडले गेले. त्यांनी समाजवादच का?’, ‘साम्राज्यशाही’, ‘विश्वकुटुंबवाद’ यांसारख्या पुस्तकांतून राजकीय विचार मांडले. त्यांनी पंडिता रमाबाई’ लेखातून स्त्रीमुक्तीविषयी भूमिका स्पष्ट केली. जनवाणी’ आणि साधना’ साप्ताहिकांतून सातत्याने लेखन केले. आवाहन आणि आवाहन’, ‘ऐरणीवरील प्रश्न’ ही त्यांच्या लेखसंग्रहांचे उल्लेखनीय उदाहरणे होत. त्यांनी साधनाचे संपादक पद 1981 मध्ये स्वीकारले.  त्यांचे आणीबाणी विरोधातील लेख आपातकाळाची उलटी गंगा’ या संग्रहात प्रसिद्ध झाले. त्यांनी गोव्यात तुरुंगात असताना अमेरिकन संघराज्याचा इतिहास’ लिहिला.

नानासाहेब गोरे हे स्त्रीमुक्तीचे ठाम पुरस्कर्ते होते. स्त्रियांना समान हक्क व स्वशासन मिळणे हीच खरी मुक्तीअसे त्यांचे मत होते. त्यांनी हुंडादारूअत्याचार यांविरोधात स्पष्ट भूमिका घेतली. राजकीय पक्ष फक्त मतांसाठी काम करतातस्त्रीमुक्तीसाठी नाही अशी त्यांची टीका होती. त्यांनी मुस्लिम स्त्री विधेयकावर खुलेपणाने विरोध व्यक्त केला. त्यांनी धार्मिक समजुतींवर प्रबोधन करणे गरजेचे आहे असेही सांगितले. त्यांनी स्त्रीभ्रूण हत्यागर्भलिंग परीक्षण यांवर कठोर टीका केली. त्यांनी राजकीय मतभेद असूनही ताराबाई मोडकगोदावरीबाई परुळेकर यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला.

कॉलेजमध्ये त्यांची सुमतीबाई कीर्तने यांच्याशी ओळख झाली. सुमतीबाई त्यावेळी विधवा होत्या. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सनातनी विचारांमुळे वडिलांनी या लग्नाला मान्यता दिली नाही, पण नानासाहेबांनी 1934 मध्ये सुमतीबाईशी लग्न केले. सुमतीबाई बी ए पदवीधर आणि शिक्षिका होत्या. नानासाहेब पूर्णवेळ राजकीय कामात व्यस्त असल्याने संसाराची जबाबदारी सुमतीबाईंवर होती. त्यांना शुभा ही एकुलती मुलगी. सुमतीबाईंची प्रकृती 1970 पासून हळूहळू खालावली. त्यांचे निधन 1976 मध्ये  झाले. त्यांची मुलगी शुभा ही आता अमेरिकेत असते.

नानासाहेबांचे निधन वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी 1 मे 1993 रोजी झाले. 

– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here