Home गावगाथा

गावगाथा

माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी त्याचा गाव त्याच्या मनातून दूर जात नाही. आठवणीअनुभवसंस्कारतेथे झालेली शरीर व मन यांची घडण यांच्या मिश्रणातून गावाबद्दलची जी ओढ तयार होते, ती विलक्षण असते. म्हणूनच माणसाने त्याच्या गावाचे नाव कोठेही निव्वळ वाचले-पाहिले तरी त्याला आनंद होतो ! प्रत्येकाचे ते गाव कायमस्वरूपी नोंदले जावे आणि तेथील प्रथा-परंपरा-जत्रा-इतिहास या तऱ्हेची माहिती जगभर सर्वत्र पोचत राहवी याकरता महाराष्ट्रातील सर्व गावांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रत्येक व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकते. तुम्ही तुमच्या गावाची माहिती शक्य तर ललित रीत्या लिहून पाठवावी. मात्र त्यातील माहिती शंभर टक्के सत्य, दोनदा तपासून पाहिलेली असावी. ती माहिती लेखकाचा फोटो-नाव-संपर्क यांसह ‘थिंक महाराष्ट्रचे वेबपोर्टल आणि अॅप यांवर प्रसिद्ध केली जाईल. हेच काम ऑडिओ – व्हिडिओ – फोटो प्रेझेंटेशन या प्रकारेदेखील सादर करता येऊ शकेल. 

म्हणतात कुंतीपूरचे झाले कोतापूर ! (From Kuntipur to Kotapur Village)

कोतापूर हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील डोंगररांगांनी वेढलेले आणि दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेले छोटेसे निसर्गसंपन्न जुने गाव आहे. कोतापूर हे लहान गाव आहे. लोकवस्ती सुमारे दीड हजार माणसांची आहे. गावाच्या इतिहासासंदर्भात ‘कुतापूर ताम्रपट’ हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहे. त्यात प्राचीन काळातील उल्लेख सापडतात. कोतापूर नावाची दंतकथा आहे. कोकणातील सण-उत्सवांचे वैभव कोतापूरलाही लाभले आहे. जिल्हास्तरीय नासा-इस्रो स्पर्धेत गावातील मुली इस्रो आणि नासा या दोन्ही संस्थांना भेटी देऊन आल्या आहेत...

बोरी बुद्रुकचे आकर्षण सर्वांगांनी !

2
जुन्नर हा एकमेव पर्यटन तालुका महाराष्ट्र राज्यात मानला जातो; म्हणजे तो अनेकानेक आकर्षणांनी भरलेला आहे. तो पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कडेकपाऱ्यांत वसलेला आहे. जुन्नर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी. बोरी बुद्रुक हे निसर्गसंपन्न गाव जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आहे. तेथे अश्मयुगाच्या खुणा सापडल्यामुळे त्या गावाच्या ऐतिहासिकतेच्या खजिन्यात अपूर्व अशी भर पडली आहे. इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकातील राखेचे पुरावशेष डेक्कन कॉलेज यांच्या पुरातत्त्वीय संशोधनातून तेथे आढळून आले...

करावेगावाचे झाले सीवूड

करावेगाव हे ठाणे जिल्हा आणि ठाणे तालुका यांच्या दक्षिण टोकाला आहे. गावाच्या पश्चिमेस ठाणे खाडी तर दक्षिणेस पनवेल खाडी येते. करावेगाव हा संपूर्ण आगरी समाजाचा गाव होता. ते लोक खाडीत मासेमारी करत असत. तेथे कोलंबी, बोईस, चिंबोरी, जिताडा, कोत, पाला असे चवदार मासे आणि खेकडे मिळत. गावकरी कष्टकरी होते. ते चारपाच मैल अंतर सहज कशासाठीही चालत जात असत. करावेगावाच्या पाठीमागून ‘पाम बीच’ हायवे गेला आहे. सिडको प्रशासनाने बेलापूर आणि करावेगाव यांच्यामधील खाडीकिनारी आधुनिक जेटी तयार केली आहे. तेथून खाडीमार्गे जलवाहतूक होईल असे अपेक्षित आहे. करावेगावाच्या ईशान्य भागात ‘सीवूड’ रेल्वेस्थानक आहे...

गुडघे गावचा ग्रामोदय

दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत...

आठवणीतले वाटूळ

वाटूळ हे वारकऱ्यांचे गाव ! पवित्र तो देश, पावन तो गाव | जेथे हरीचे दास जन्मा येती || आषाढी-कार्तिकी पायी वारी. कीर्तनात रममाण होऊन नाचणारे कीर्तनकार आणि कीर्तन ऐकण्यासाठी जमलेले आबालवृद्ध... माझ्या आजी, काकी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन कीर्तनात तल्लीन झालेल्या आठवल्या की जाणवते तोच खरा वाटूळगावचा इतिहास ! निसर्ग म्हणजे काय हे कळण्याइतके वय नव्हते तेव्हा ! पण पाखरांचा किलबिलाट, ऋषीमुनींप्रमाणे ध्यानस्थ बसलेले डोंगर आणि मध्येच झुळझुळ वाहणारी नदी दिसली की मन प्रसन्न होत असे. तांबडे फुटले, की पूर्व दिशा उजळून निघायची आणि थोड्याच वेळात ताऱ्यांचा लालभडक सखा डोके वर काढायचा... अहाहा !! खूप सुंदर सूर्योदय ...

वाटूळ ! (Watul Village)

विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची माहिती दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच...

गरूडपाड्याची गावकी (Garudpada model of village based civil society)

मी गावकी हा शब्दच मूळात ऐकला तो 2014 साली. आम्ही रोहा रोडवरील गरूडपाडा गावात डिसेंबर 2014 ला राहण्यास आलो. पंचावन्न-साठ घरांचे चिमुकले गाव. तोपर्यंतचे सगळे आयुष्य शहरात गेले आणि त्यातील अर्ध्याहून अधिक महानगरात घालवले, त्यामुळे ‘खेड्यातील घरा’चे स्वप्न अनुभवणे बाकी होते. गावाचे गरूडपाडा हे नाव कसे पडले, कधीपासून गाव वसले असे प्रश्न मनात आले. खरे तर, शासन दरबारी गरूडपाडा गाव अस्तित्वात नाही. समोर काविर नावाचे गाव आहे त्याचाच उल्लेख सापडतो. काविरच्या रहिवाशांची शेते या गावात होती. ते त्यासाठी येथे येत आणि ‘पाड्यावर जातो’ असा उल्लेख करत...

जामनेर – बागायती आणि सुसंस्कृत (Jamner – city with rich development and cultural activities)

जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे...

वैभवशाली लातूर (Latur’s cultural affluance)

मला लातूर, कानापूर-मोहा आणि मुंबई ही गावे व्यक्तिगत जिव्हाळ्याची वाटतात. लातूर हे माझे जन्मगाव. लातूर सध्या शिक्षणवर्गांसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून गाजत असते. माझे लातूरशी भावनिक नाते आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथे झाले. बीड जिल्ह्यातील कानापूर-मोहा हे माझे वडिलोपार्जित गाव. मी उच्च शिक्षण व व्यवसायक्षेत्र म्हणून मुंबई महानगराशी ममत्वाने जोडला गेलो आहे. देश आणि राज्य स्तरावर नोंद घेता येईल असा भौगोलिक वा नैसर्गिक समृद्धीचा वारसा न लाभलेले लातूर गाव ! मात्र ते भूकंपामुळे सर्व जगास परिचयाचे झाले. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असल्याने लातूर गावाचा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन आढावा घेत आहे. लातूर गावास प्रागैतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ती तेथे प्राप्त झालेल्या शिलालेखांतून सिद्ध होते...

संतनगरी आकोट (Akot- City of Saints from Vidarbha)

आकोट हे गाव विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतनगरी म्हणूनच ओळखले जाते. तेथे श्री नरसिंग महाराज यांचे वास्तव्य होते. ते शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन संत व गुरुबंधू होते. त्या दोघांमध्ये स्नेहबंध घट्ट होता. गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यास आकोट येथील त्यांच्या ‘झोपडी’त येत असत; त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा चालत असत. त्या संबंधात विविध दंतकथा आहेत. गजानन महाराजांनी मनकर्णिका व दुसरी अकोलखेडची विहीर, या दोन विहिरींना पाणी आणून आकोट परिसरात सुबत्ता निर्माण केली अशीही कहाणी आहे...