संस्था

महाराष्‍ट्रातील सामाजिक उपक्रमांचा – संस्‍थात्‍मक कार्याचा आढावा!

top_images7

ज्याचा त्याचा विठोबा

‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्‍या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्‍या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...
‘व्यासपीठ’तर्फे आयोजित ‘शिक्षण आणि सुजाण नागरिकत्व’ या कार्यक्रमात योगेश देसाई (कारागृह अधीक्षक, ठाणे), अभय ओक (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ

‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल?

 शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी प्रेरणा-प्रबोधन-प्रयत्न अशी संकल्पना ठरवून, त्यासाठी शैक्षणिक घटकांचा म्हणजे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय ठरवून ‘व्यासपीठ’च्या...

समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची!

'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक आहे. अन्य प्रकारच्या अपंगत्वात अपंग व्यक्तीस आपल्या अपंगत्वाची जाणीव असते. त्यावर मात करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा तिचा प्रयत्न असू शकतो. ते शिक्षण, प्रशिक्षण, अन्य व्यक्ती व संस्था यांची मदत मिळवून अंशत: तरी स्वावलंबी होऊ शकतात. मतिमंदांच्या बाबतीत तसे होत नाही. त्यांना आपल्यात काही उणीव आहे याची जाणीव-बोध नसतो. मतिमंदत्व जर तीव्र असेल तर भोजन, स्वच्छता, संरक्षण या गोष्टीही पालकांनाच कराव्या लागतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतिमंदत्वाचे प्रमाण कितीही असले तरी अशा व्यक्तींची काळजी कायम दुस-यांना घ्यावी लागते...

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्प’

'थिंक महाराष्ट्र' प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. पण त्या सर्व दूरच्या व लांब पल्ल्याच्या गोष्टी म्हणून बाजूला ठेवून सध्या तीन उपक्रम हाती घ्यावे आणि त्या आधारे...
_1192_2

माझी साडेतीनशे नातवंडे

0
मी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो, वाढलो व तसाच आहे. खाऊन-पिऊन सुखी; शिक्षणात ब-या डोक्याने वावरलो. मोठ्या न् खोट्या इच्छा-आकांक्षा कधीच मनात आल्या नाहीत. माझे वडील,...

सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता

मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला...
sainik1

वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा!

अनुराधा गोरे यांची जीवनकहाणी ऐकताना मला कवी फ.मु.शिंदे यांच्या ‘आई’ कवितेतील ओळी आठवतात. सुरुवातीच्या ओळी अशा आहेत. आई म्हणजे काय असते? ‘घरातल्या घरात गजबजलेले गाव असते’’ आई...
_Hiware_Bajar_1

हिवरेबाजार आणि पोपट पवार

आदर्श., यशवंत... निर्मल वनग्राम पोपट पवारांचा हिवरेबाजार सुखानं, आनंदानं, नांदणारं गाव माझ्या गावात व्यसनाचा वास नाही इथं कोणीही अक्षरआंधळा नाही गावच्या घराघरात गोबरगॅस, ऊर्जाचूल घराघरात एक नाही तर दोनच मुलं. गावचं...

गिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!

गिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र...

आम्ही कुटुंबीय समाजाचे उतराई

0
मी आणि माझा मुलगा; नव्हे आम्ही सारे कुटुंबीय ज्या समाजाच्या आधारे, ज्या मित्रांच्या मदतीने इथपर्यंतचा पल्ला गाठला, त्याचे स्मरण म्हणून- अंशमात्र उतराई व्हावे म्हणून...