1 POSTS
उषा रामवाणी-गायकवाड लेखिका संपादक, संशोधक आहेत. त्यांची मातृभाषा सिंधी आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून ‘एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’ या विषयावर मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय पी एच डी पदवी 2006 साली मिळवली. त्यांनी ‘मृण्मयी’ हा दिवाळी अंक 1993 पासून सहा वर्षे एकहाती संपादित- प्रकाशित केला. त्यांनी लिहिलेली पुस्तक परीक्षणे, लेख, कविता आणि नामवंतांच्या मुलाखती विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ‘निर्वासित’ हे आत्मकथन प्रकाशित आहे. त्याला राज्यस्तरीय पाच पुरस्कार मिळाले आहेत.
म्हण’ या शब्दाची निर्मिती संस्कृतमधील ‘भण’ या धातूचा अपभ्रंश होऊन झाली आहे. म्हण ही लोकांच्या तोंडी सतत येऊन दृढ होते. न.चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या ‘चिमुकले, चतुरणाचे, चटकदार असे वचन अशी केली आहे. कोशकार वि.वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ असे म्हटले आहे. वा.म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात’...