Home Authors Posts by प्रतिनिधी

प्रतिनिधी

207 POSTS 0 COMMENTS

कोकणातील जलव्यवस्था

कोकणामध्ये कणकवली येथे भरलेल्या सिंचन विकास परिषदेतून गावाच्या परिसरात पूर्वी पाण्याच्या काय व्यवस्था असत ते स्पष्ट झाले. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार पाणवठे होते. काही ठिकाणी बोगदे काढून पलीकडच्या घळीमधील पाणी वळवले गेले होते. त्या सर्व पाण्याच्या व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. पण त्यांच्या अवशेषांमधून एकंदर भारताच्या विविध भागांत समाजजीवनाची पाण्याच्या संदर्भातील व्यवस्था कशी होती याचे संकेत मिळतात...

तिफण फाउंडेशनचा समाज माध्यमातून ‘कृषी विस्तार’

समाज माध्यमांच्या वापरातून कृषी विस्तार अधिक व्यापकपणे व्हावा या उद्देशाने तिफण फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांपर्यंत नवनव्या शेती पद्धतींची माहिती, आधुनिक शेतकीचे ज्ञान व कौशल्ये पोचावी याकरता सहाय्यक कृषी अधिकारी हे फेसबुक पेज व द फार्म बुक या युट्यूब चॅनलचा वापर केला जातो...

ब्राह्मण कोण ?

0
इंग्रजांनी ब्राह्मण वर्ग कर्मकांडामध्ये रुळलेला, तात्त्विक विवेचन करणारा व केवळ बौद्धिक गोष्टी करणारा असतो, असा गैरसमज पसरवला. पण वास्तवात स्वतः अग्रेसरत्व करणारा असा माणूस ब्राह्मण म्हणून ओळखला जातो. तो सर्व क्षेत्रांमध्ये आहे. प्रत्यक्ष त्या त्या जीवनाच्या अंगाचे धुरीणत्व करणे, त्या क्षेत्राला दिशा देणे, प्रत्यक्ष ते आचरून इतरांना मार्गदर्शन करणे ही ब्राह्मण वर्गाची वैशिष्ट्ये होती...

मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत

0
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...

दुर्गादेवीचा दुष्काळ ( Ill famous famine of Durgadevi in thirteenth century)

1
बाराव्या आणि तेराव्या शतकांच्या काठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळात लाखा वंजारींमधील दुर्गादेवी या कर्तबगार महिलेने त्या काळच्या बिहार या गंगेच्या काठच्या प्रदेशातून धान्य आणून महाराष्ट्रातील समाज तेरा वर्षे अखंड वाहतूक करून जगवला! ती लाखा बैलांची वाहतूक इकडून तिकडे उत्तरेत नेऊन करत असे. महाराष्ट्रात तिचा सर्वत्र उल्लेख त्या काळापासून ‘दुर्गादेवी’ असा होऊ लागला. त्या काळाच्या इतिहासात तो ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ असे म्हटले जाऊ लागले...

भारतीय संस्कृती तलावांकाठी वाढली! (Water supply lakes and tanks is a special feature of...

0
स्थलांतर करावे लागू नये म्हणून भारतीय पूर्वजांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी उंचावर, पठारांवर तलावांची निर्मिती करून ठेवली. त्या ठिकाणी पाणी साठवून, त्या त्या ठिकाणच्या प्राणी जीवनाला, मानवी जीवनाला आधार दिला. भारत देशात पाच लाख खेडी होती, म्हणजे साधारणतः प्रत्येक गावाला कमीत कमी दोन तलाव होते! भारतीय जीवन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावांच्या काठी वाढलेले आहे...

प्रेम भारतीय शास्त्रीय संगीतावर!

0
जे कानाला गोड वाटते आणि हृदयाला भिडते ते चांगले संगीत अशी स्पष्ट आणि साधीसरळ व्याख्या संगीताची करता येईल. जगातील सगळेच संगीत तसे मधुर व भूरळ घालणारे, पण भारतीय शास्त्रीय संगीताला कुठेच तोड नाही. भारतीय संगीतातील लावणी, गजल, कव्वाली, भावगीत, भक्तिगीत यांचा थाट काही वेगळाच...

जीवनशैलीतील दूरदृष्टी

0
“भाषांतर म्हणजे जे आपल्या भाषेत नसतं, समाजात नसतं ते दुसरीकडून आणणं. तरच आपण त्यांच्यासारखे होतो,” भाषांतराविषयीचे असे चिंतन भवरलाल जैन यांनी साहित्य अकादमीच्या जैन हिल्स येथील भाषांतर कार्यशाळेत मांडले. भवरलाल एक कष्टाळू, निष्ठावंत शेतकरी, पण त्यांनी साहित्य व सामाजिक क्षेत्रात केलेले काम अजोड आहे...

दादा कोंडके आणि सेन्सॉरची कैची

दादा कोंडकेंच्या सिनेमांवर द्वयर्थी संवाद आणि गीते यांमुळे सेन्सॉरची कैची चालायची. त्यावर दादा अफलातून युक्तिवाद करून एकेक कट रद्द करून घेण्यासाठी तुफान आवेशाने लढायचे. दादांच्या युक्तिवादापुढे तत्कालीन सेन्सॉरवालेही नि:शब्द होत...

राहुल गांधी यांचे महत्त्व सद्यस्थितीत आहे काय?

राहुल गांधी यांनी त्यांच्या आयुष्याशी जोडलेले सारे गौरवास्पद संदर्भ त्यांच्या समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी वापरण्यास कायम नकार दिला. ही एकच गोष्ट आत्ताच्या सत्तेसाठी भिंत बनून उभी आहे. हिंदुत्वाला उत्तरेत उधाण आलेले असताना दक्षिणेने सातत्याने प्रागतिक भारतीयत्वाला स्वीकारलेले दिसून येते...