नितेश शिंदे
जलसंपन्न कोंढापुरीचे स्वप्न – धनंजय गायकवाड (Dhananjay Gaikwad’s Dream of Plentyful Kondhapuri)
पुणे-नगर रस्त्यावरील कोंढापुरी गावचे धनंजय गायकवाड. ते गावात पाणीटंचाई भेडसावू लागल्याने खवळले आणि त्यांनी दोन वर्षांच्या अवधीत गावाला जलसंपन्न करून टाकले! म्हणजे ते म्हणाले, की अजून दोन-पाच वर्षें उन्हाळ्यात गावात पाण्याची टंचाई नसेल; परंतु नंतर मे महिन्यातही गावात पाणी असेल! आणि खरोखरच,
गुरव म्हणजे शंकराचे पुजारी (Gurav – ShivShankar’s Speciel Priests)
गुरव जातीची निर्मिती भारतीय समाजात विशिष्ट परिस्थितीत झाली. गुरवकीचा व्यवसाय ग्रामदेवतांची पूजाअर्चा रोज व्हावी, नंदादीप लावला जावा,मंदिराची स्वच्छता राखली जावी या गरजेतून निर्माण झाला व त्यासाठी देण्याच्या सेवामूल्याची तरतूद बलुता पद्धतीत करण्यात आली...
घराघरांत शाळा – एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशनचा नवा उपक्रम (School’s on TV Screen – MKCLKF’S...
मुले सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळात सहसा शाळेमध्ये असतात, परंतु कोरोनामुळे ती घराघरांत बंदिवान झाली आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या घरी सह्याद्री वाहिनीने शाळा आणली आहे. पण ती शाळा दिलखुलास, हसरी, खेळकर आहे आणि मुले शाळेमध्ये मौजमजेत अभ्यास करत आहेत असे दृश्य पालकांना पाहण्यास मिळते.
महाराष्ट्र दिन ऑनलाईन (Maharashtra Day Goes Online)
महाराष्ट्र राज्य स्थापना दिन यावर्षी साजरा होऊ शकला नाही. उपचार म्हणून झेंडावंदनासारखे कार्यक्रम झाले. खरे तर, या वर्षी महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठ वर्षे झाली. सर्व लोक लॉकडाऊनमुळे घरातच बंदिस्त आहेत. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट आणि कॉम्प्युटर यांचा उपयोग वाढला आहे. काही संस्थानी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षात काही उपक्रम नव्याने सुरू केले.
साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a lesson)
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)
मराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव,...
शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...
अनंत फंदी (Anant Fandi)
अनंत फंदी हे संगमनेरचे. पूर्वजांचा धंदा सफारीचा, गोंधळीपणाचा, भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला. तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! ‘फंदी अनंत कवनाचा सागर’ असे त्या...
सुश्लोक वामनाचा (वामन पंडित) (Vaman Pandit)
वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका,...
साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे धर्मगुरू म्हणून वसईत गेल्या बावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून ते त्यांच्या नावापुढे मोन्सी असे लिहितात. तो कोणाही धर्मगुरूसाठी मोठा बहुमान आहे! मॉन्सेनियर कोरिया हे धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख लेखक म्हणून आहे. त्यांनी आजवर बत्तीस पुस्तके लिहिली आहेत. ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’, ‘मधाच्या घागरी’; तसेच, त्यांनी वसई किल्ल्यांतून नेलेल्या व आता हिंदू तीर्थक्षेत्री असलेल्या अडतीस घंटांचा शोध नऊ जिल्ह्यांत जाऊन लावला. त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे...