5 POSTS
मानसी चिटणीस या कवयित्री आहेत. त्या विविध साहित्यिक संस्थांत कार्यरत आहेत. त्यांचे लेखन विविध मासिके आणि आघाडीची वृत्तपत्रे येथे प्रसिद्ध होत असते. त्यांची “सृजनभान’, ‘सांजवर्खी शकुन’, ‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ हे तीन कवितासंग्रह आणि ‘उत्सव’ हा कथासंग्रह ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. त्या ‘कवितासखी’ या स्वरचित कार्यक्रमाचे सादरीकरण, तसेच ‘ही कविता आली तुम्हास भेटायला’ या समूह कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात.
मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत... गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे...