द.के.गंधारे हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील अँड. एम.एन.देशमुख महाविद्यालय, राजूर येथे मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांचा ‘वावटळ’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहे.
अशोक लिंबेकर यांचे लेखन व्यापकत्व धारण करत आहे. त्याची झलक त्यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे' या ललित लेखसंग्रहातून पाहण्यास मिळते. ते मलपृष्ठावर लिहितात, लहान मुलाच्या निरागस डोळ्यांनी पाहिलेले ते गाव, रान-शिवार, निसर्ग आणि त्यातील अनेक घटक हा या लेखांचा विषय आहे...