Home Search

यवतमाळ - search results

If you're not happy with the results, please do another search

यवतमाळचे सर्पमित्र श्याम जोशी

0
श्याम गोविंदराव जोशी म्हणजे यवतमाळमधील विशेष व्यक्ती आहेत. ते वयाच्या चौदाव्या वर्षांपासून सेहेचाळीस वर्षें सर्पांच्या राज्यात रमून गेले आहेत. जिल्ह्यात कोठेही साप निघाला तर...

लिंगा गावचे अवधुत पंथी स्तंभ !

लिंगा गाव यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आहे. लिंगा-बोरगाव हे जोडगाव आहे, दोन्ही गावांची ग्रामपंचायत एक आहे – बोरगावचे सहा आणि लिंगाचे चार सभासद निवडले जातात. अधिकतर बोरगावचा सरपंच असतो. परंतु ती पोटगावे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. लिंगा वेगळे आणि बोरगाव वेगळे. लिंगाची लोकवस्ती साडेतीनशे. बोरगावची लोकवस्ती बाराशेच्या आसपास आहे...

रंगो बापूजी गुप्ते (Rango Bapuji Gupte)

काही नावांपुढे विशेषणे लावायची काहीच आवश्यकता नसते. रंगो बापूजी गुप्ते हे त्यापैकीच एक नाव आहे. साताऱ्याच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यावर ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडमध्ये जाऊन सनदशीर मार्गाने लढणारे छत्रपतींचे वकील म्हणून रंगो बापूजी प्रसिद्ध आहेत. छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाचाही दावा त्यांनी लावून धरला. चौदा वर्षे लढा देऊनही अपयश आल्यावर सनदशीर मार्ग सोडून देऊन त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग धरला...

पालडोह शाळा, वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ! (Paldoh School, 365 days a year!)

‘पालडोह’ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील घाटवळणावरचे गाव… ते गाव शेतीचे वाद, कौटुंबिक भांडणतंटे, भुरट्या चोऱ्या, अंधश्रद्धा, बालविवाह अशा कारणांनी तालुक्यात बदप्रसिद्ध होते. राजेंद्र परतेकी यांनी गावच्या या शिक्षणविषयक उदासीनतेवर मात करण्याचे ठरवले. राजेंद्र यांनी विद्यार्थी, पालक, गाव, शाळा यांचा मेळ परस्परांशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी गावतरुणांची क्रिकेट, व्हॉलिबॉल, खो-खो टीम गावाशेजारच्या जत्रेमध्ये जमवली, त्या संघाकडून खेळणे, टीम जिंकण्यासाठी निकराची लढाई करणे अशा गोष्टी गावच्या मुला-तरुणांमध्ये सुरू केल्या...

एकोणपन्नासावे साहित्य संमेलन (Forty-Nine Marathi Literary Meet 1973)

यवतमाळ येथे 1973 साली झालेल्या एकोणपन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘गीतरामायण’कार ग.दि. (गजानन दिगंबर) माडगूळकर ऊर्फ गदिमा. ‘गदिमा’ हे केवळ ‘गीतरामायण’ एवढे अप्रतिम काव्य लिहून साहित्यविश्वात अजरामर झाले असते. ते प्रासादिक, प्रतिभाशाली आणि प्रसन्न असे गीतकार होते. त्यांच्या गीतरचनेला कवितांचा दर्जा लाभला. त्यांच्या पटकथा-संवादांनीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः चमत्कार केला !माडगूळकर हे कोठल्याही मैफिलीचा ताबा घेत असत...

संत गजानन महाराज – शेगावीचा राणा (Saint Gajanan Maharaj of Shegaon)

0
शेगावचे मूळ नाव शिवगाव. ते शिवगाव असे तेथील प्रसिद्ध शिवमंदिरामुळे प्रथम पडले. त्या शिवगावचे झाले शेगाव. शृंग ऋषींनी वसवलेले गाव म्हणून शेगाव अशीही एक व्युत्पत्ती आहे. शेगाव हे वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातील गाव. ते तालुक्याचे ठिकाण आहे. संत गजानन महाराज तेथे आल्यामुळे शेगावला देशभर अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. शेगाव नगरी म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि सुंदर नियोजनाचे उत्तम उदाहरण...

परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक

चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...

वक्ता दशसहस्रेषु… प्राचार्य राम शेवाळकर

राम बाळकृष्ण ऊर्फ ‘राम शेवाळकर’. ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातकीर्त वक्ते, अध्ययन-अध्यापन-शैक्षणिक प्रशासन यांशी निगडित; तसेच, कला-साहित्य-संस्कृतीविषयक अशासकीय स्वायत्त विविध मंडळांचे सदस्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...

बोरी खुर्दला वैभव नदीचे !

बोरी अरब हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा या तालुक्यात येते. तेथील नदीला अडान नदी म्हणतात. त्या नदीमध्ये असलेल्या एका ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात. त्या गावचे माठ आणि चहा प्रसिद्ध आहेत. तेथे कापसाचा कारखानाही आहे...

बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राची वाटचाल

बदनापूर संशोधन केंद्र हे अखिल भारतीय कडधान्य सुधार प्रकल्पातील एक प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र जालना जिल्ह्यात येते. त्याचा कारभार मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालतो. तेथे महाराष्ट्रातील महत्त्वाची कडधान्ये, विशेषत: तूर, मूग, उडीद आणि हरभरा या पिकांवर संशोधन केले जाते...