Home वैभव

वैभव

महाराष्ट्राच्या गावोगावची सांस्कृतिक वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. त्या साऱ्या वैभवाचे डॉक्युमेण्टेशन व्हावे या हेतूने प्रथापरंपराकिल्लेबाजारखाद्यसंस्कृतीवन्यवैभव अशा विविध प्रकारची माहिती संकलित करून ती ‘संस्कृतिवैभव’ सदरात विभागशः मांडली जाते. महाराष्ट्रातील विविध कला आणि त्या कला साकार करणारे कलाकार त्यामध्ये येतातच. यामधून यथाकाल महाराष्ट्राचे ऑनलाईन म्युझियमच साकार होईल !

मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्राम

2
भारत देशाच्या नकाशाच्या मधोमध असलेला हैदराबादचा प्रचंड मोठा भूभाग निजामाच्या ताब्यात होता. तो भारतात विलीन झाल्याविना भारताची अखंडता प्रस्थापित होणार नव्हती. भारताचे स्वातंत्र्य अधुरे राहणार होते. तसेच हैदराबाद संस्थान चोहोबाजूंनी भारत भूमीने वेढलेले होते. परंतु निजामाने या वास्तवतेचा विचार न करता स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरला ! हैदराबाद संस्थानावर धर्माने मुसलमान असणाऱ्या मीर उस्मान अली खान निजाम याचे राज्य होते. तरी तेथील शहाऐंशी टक्के जनता हिंदू होती आणि ती बहुतांश जनता ‘भारतात विलीन व्हावे’ या मताची हाती. स्वतंत्र भारत सरकारची निजामाबरोबर अनेक बोलणी असफल झली तेव्हा भारताने ‘ऑपरेशन पोलो’ ही पोलिस कारवाई केली...

महत्त्वाच्या काही बखरी (Few significant Marathi Bakhar)

0
मराठी साहित्यात मराठीच्या इतिहासाच्या दृष्टीने काही बखरींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांची वर्णनात्मक नोंद या लेखात केली आहे. सभासद बखर, सप्तप्रकरणात्मक बखर, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, होळकरांची बखर (कैफियत), महिकावतीची बखर अशा एकूण सुमारे दोनशे बखरी लिहिल्या गेल्या असाव्यात. मराठीतील अधिकतर बखरी 1760 आणि 1850 या कालावधी दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत. बखरींचे लेखन सर्वसामान्यपणे कोणा तरी राजकीय पुरुषाच्या आज्ञेवरून झालेले असते. मुसलमानी तबारिखांचा तो परिणाम असावा...

ऐतिहासिक महत्त्वाच्या बखरी (Bakhar – Literary form of historical writing)

0
बखर हा ऐतिहासिक, विशेषकरून मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा लेखनप्रकार आहे. ‘बखर’ या शब्दाचा कोशातील अर्थ हकिगत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र असा आहे. गद्यात लिहिलेला ऐतिहासिक वृत्तांत असा अर्थ, पुढे त्याला प्राप्त झाला. हा शब्द ‘खबर’ (वार्ता, माहिती) या फारशी शब्दापासून वर्णविपर्यासाने बखर असा तयार झाला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या, त्या काळात मराठी भाषेवर फारशी भाषेचे वर्चस्व होते हे लक्षात घेता वरील व्युत्पत्ती बरोबर असावी असे वाटते. बखरींत ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन वाचण्यास मिळते...

कशेळीचे आम्ही कुळकर्णी

आमच्या कुळकर्णी घराण्याची श्रीमंती खूप होती. त्याची ख्याती जंजिऱ्यापर्यंत पोचली होती. सिद्दी चाचे लुटमार करण्याकरता कशेळी येथे 1870 साली समुद्रावरून आले होते. त्यांनी वाड्यात येऊन स्त्रियांच्या वस्त्रांसकट दागदागिन्यांची लुटमार केली होती. मात्र, एका धाडसी कुळकर्णी महिलेने हाताला लागेल तेवढे सोने अंगावर घालून जवळच्या विहिरीत उडी मारली. ती चाचे जाईपर्यंत तेथेच दडून बसली होती. त्यामुळे ती वाचली. तिच्या अंगावर सोने इतके होते, की त्यातून मिळालेल्या पैशांवर पुढे कुळकर्ण्यांच्या चार पिढ्या जगल्या. परंतु श्रीमंती गेली होती...

देवीहसोळची देवीभेट कातळशिल्पावर

कोकण हा पुरातत्त्व शास्त्रासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर, लांजा आणि देवगड या तालुक्यांच्या पट्टयात जमिनीतून, अचानक वर यावीत तशी कातळशिल्पे-शिल्पचित्रे-खोदचित्रे (Petroglyph) गेल्या काही वर्षांत समोर आली ! रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळपास दोनशेऐंशीपेक्षा जास्त कातळशिल्पे सापडली आहेत. आमच्या कशेळी व राजापूर या भागांत देवाचे गोठणेजवळ ही भव्य कातळशिल्पे सापडली, त्याची ही माहिती…

अमृत्या – आमच्या कशेळीचा फणस

माझे आजोबा म्हणत, ’अमृत्या खाशी, त्याची कीर्ती वीस कोशी’. दरवर्षी त्याला खूप फणस लागतात. हा लाल मातीचा गुण असावा. कशेळी गाव तिन्ही बाजूंनी पसरलेल्या अथांग अरबी समुद्राच्या कुशीत उतरत्या डोंगरात शांत वसलेले आहे. त्या गावात 1661 मध्ये शिवाजी महाराजांचे आगमन झाले होते ! गावात कऱ्हाडे ब्राह्मणांची वस्ती जास्त आहे. आमच्या आगरातील बरक्या फणसाचे वैशिष्टय असे, की त्याचे गरे रसाळ व चवीला अमृतासारखे गोड लागत. म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याला ’अमृत्या’ असे योग्य नाव दिले होते...

दिनेश अडावदकर ज्येष्ठ निवेदक

कर्जतचे दिनेश अडावदकर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रामध्ये ज्येष्ठ निवेदक आहेत. निवेदक म्हणून निवेदन क्षेत्रात त्यांचा लौकिक मोठा आहे. त्यांना कला-भाषा, साहित्य यांची आवड लहानपणापासूनच होती. त्यांचे कविता, निबंध, स्फूट लेखन शालेय वयापासून चालू असे. प्रसिद्ध लेखक-कवींबद्दल आणि कलावंतांबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल कायमच राहत आलेले आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, त्यांची स्वाक्षरी घेणे, त्यांची व्याख्याने किंवा कार्यक्रम यांना हजेरी लावणे हीच त्यांची आवड. ते वर्णन करून सांगतात की माझ्या त्या वेळच्या स्वच्छंद वागण्यात शिस्त नव्हती. मधुमक्षिकेप्रमाणे ज्या फुलातून मकरंद मिळेल तेथून तो गोळा करणे, एवढेच त्या वयात ठाऊक होते...

अजरामर ऐ मेरे वतन के लोगो… (Ae Mere Watan Ke logon Memorable Song)

0
भारतीय संगीतात शेकडो प्रकार गायले आणि वाजवले जातात; किंबहुना गाण्यासाठी भारतात निमित्तच हवे असते. भारतीय चित्रपटांबरोबर चित्रपटगीतांचे एक वेगळे मोठे विश्व तयार झाले आहे. ती संगीतकार, गायक आणि त्यांचे चाहते अशी दुनिया आहे. हिंदी चित्रपट गाण्यांमध्ये हटके आणि गाण्यांचा सीझनल प्रकार म्हणजे देशभक्तिपर गीते. जयंत टिळक यांनी काही निवडक देशभक्तिपर गाण्यांचा उत्कट आढावा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने घेतला आहे. ते लिहितात - संगीतामध्ये माणसाच्याच काय, पण प्राण्यांच्याही भावना चेतवू शकण्याची ताकद आहे. अशी सुरुवात करून टिळक म्हणतात- मात्र एका गाण्याविषयी लिहिलं नाही तर चित्रपट संगीतविषयक सर्व लेखन अपुरं ठरेल. ते गीत आहे - ऐ मेरे वतन के लोगो... त्याच गीताची ही कहाणी...

टेफ्रांचा पाऊस ! (Indonesion Tefra found in Junnar – Maharashtra)

कुकडी प्रकल्पात बोरी गावाच्या वरील बाजूस येडगाव व त्या पाठीमागे माणिकडोह अशी दोन धरणे बांधली गेली. त्यामुळे कुकडी नदीचे पात्र कायम वाहते होते, ते कोरडे पडले. परंतु त्या उघड्या पात्राचा फायदा असा झाला, की त्यातून आदिमानवाची सत्यकथा प्रकट झाली ! ही गोष्ट 1987 सालातील. पुण्याजवळच्या परिसरात भौगोलिक सर्वेक्षण सुरू होते. विश्वास काळे यांना बोरी गावाजवळ कुकडी नदीकाठी राखेचे आगळेवेगळे थर आढळले. तसे थर नदीकाठाने तब्बल दहा किलोमीटरच्या परिसरात पसरलेले होते. पण ती राख नव्हती, तर तप्त ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर हवेत उडालेले खनिज, सिलिका अशा द्रव्यांच्या सूक्ष्मकणांचा तो थर होता. राखेसारख्या त्या कणांना भू-शास्त्रीय भाषेत ‘टेफ्रा’ म्हणतात...

बोरी बुद्रुकचे आकर्षण सर्वांगांनी !

2
जुन्नर हा एकमेव पर्यटन तालुका महाराष्ट्र राज्यात मानला जातो; म्हणजे तो अनेकानेक आकर्षणांनी भरलेला आहे. तो पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कडेकपाऱ्यांत वसलेला आहे. जुन्नर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी. बोरी बुद्रुक हे निसर्गसंपन्न गाव जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आहे. तेथे अश्मयुगाच्या खुणा सापडल्यामुळे त्या गावाच्या ऐतिहासिकतेच्या खजिन्यात अपूर्व अशी भर पडली आहे. इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकातील राखेचे पुरावशेष डेक्कन कॉलेज यांच्या पुरातत्त्वीय संशोधनातून तेथे आढळून आले...