Home मराठी भाषा

मराठी भाषा

महत्त्वाच्या काही बखरी (Few significant Marathi Bakhar)

0
मराठी साहित्यात मराठीच्या इतिहासाच्या दृष्टीने काही बखरींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांची वर्णनात्मक नोंद या लेखात केली आहे. सभासद बखर, सप्तप्रकरणात्मक बखर, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, होळकरांची बखर (कैफियत), महिकावतीची बखर अशा एकूण सुमारे दोनशे बखरी लिहिल्या गेल्या असाव्यात. मराठीतील अधिकतर बखरी 1760 आणि 1850 या कालावधी दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत. बखरींचे लेखन सर्वसामान्यपणे कोणा तरी राजकीय पुरुषाच्या आज्ञेवरून झालेले असते. मुसलमानी तबारिखांचा तो परिणाम असावा...

ऐतिहासिक महत्त्वाच्या बखरी (Bakhar – Literary form of historical writing)

0
बखर हा ऐतिहासिक, विशेषकरून मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा लेखनप्रकार आहे. ‘बखर’ या शब्दाचा कोशातील अर्थ हकिगत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र असा आहे. गद्यात लिहिलेला ऐतिहासिक वृत्तांत असा अर्थ, पुढे त्याला प्राप्त झाला. हा शब्द ‘खबर’ (वार्ता, माहिती) या फारशी शब्दापासून वर्णविपर्यासाने बखर असा तयार झाला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या, त्या काळात मराठी भाषेवर फारशी भाषेचे वर्चस्व होते हे लक्षात घेता वरील व्युत्पत्ती बरोबर असावी असे वाटते. बखरींत ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन वाचण्यास मिळते...

दिनेश अडावदकर ज्येष्ठ निवेदक

कर्जतचे दिनेश अडावदकर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रामध्ये ज्येष्ठ निवेदक आहेत. निवेदक म्हणून निवेदन क्षेत्रात त्यांचा लौकिक मोठा आहे. त्यांना कला-भाषा, साहित्य यांची आवड लहानपणापासूनच होती. त्यांचे कविता, निबंध, स्फूट लेखन शालेय वयापासून चालू असे. प्रसिद्ध लेखक-कवींबद्दल आणि कलावंतांबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल कायमच राहत आलेले आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, त्यांची स्वाक्षरी घेणे, त्यांची व्याख्याने किंवा कार्यक्रम यांना हजेरी लावणे हीच त्यांची आवड. ते वर्णन करून सांगतात की माझ्या त्या वेळच्या स्वच्छंद वागण्यात शिस्त नव्हती. मधुमक्षिकेप्रमाणे ज्या फुलातून मकरंद मिळेल तेथून तो गोळा करणे, एवढेच त्या वयात ठाऊक होते...

मराठीच्या सुवर्णकाळाचे स्वप्न (Dream of golden period of Marathi language)

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देऊन आणि विविध धर्मांच्या आणि जातींच्या एकशेपाच हुतात्म्यांचे बलिदान देऊन जिंकलेल्या महाराष्ट्र राज्याच्या जनतेने ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे महाराष्ट्राचे पारंपरिक मूलतत्त्व स्वीकारून राज्याची लोककल्याणाची नीती आणि सामाजिक प्रगती साधण्याचे ठरवले. मृणाल गोरे आणि तशाच इतर काही स्वाभिमानी नेत्यांनी पेरलेल्या मराठी भाषाभिमानाच्या बीजांमधून मुंबईत मराठी भाषेच्या संवर्धनाची मोहीम जोमाने फोफावली. त्यातूनच मराठी माणसाच्या मनात ‘माझे राज्य, माझी भाषा, माझी संस्कृती’ ह्या भावनेची पाळेमुळे घट्ट पसरू लागली. तत्कालीन राजकीय नेत्यांनीदेखील त्या भावनेला प्रोत्साहन दिले...

मराठीसाठी इरेला पेटले सुब्बू गावडे (Gawade’s final call for Marathi language)

मराठी भाषा आणि संस्कृती यांचे सोयर आणि सुतक, ना महाराष्ट्र सरकारला आहे-ना मराठी जनतेला; या निष्कर्षाप्रत सुब्बू गावडे येऊन पोचले आहेत. त्यांचा तो लढा सध्या विधायक अंगाने, सरकारकडे अर्जविनंत्या करून सुरू आहे. ते रोज एक विनंतीपत्र इमेलमार्गे मुख्यमंत्र्यांना पाठवतात. त्यांनी तशी तीनशे पत्रे सोळा महिन्यापासून लिहिली आहेत. त्यांतील जेमतेम पत्रांवर पोच मिळाली. कारवाई कोणत्याच पत्रावर झालेली नाही. गावडे त्यांच्या पत्राची प्रगती इमेल ट्रॅकिंग व्यवस्थेद्वारे तपासत असतात. त्यांना सरकारच्या औदासीन्याचे वाईट वाटतेच, पण त्याहून अधिक राग येतो तो मराठी साहित्यसंस्कृती संस्थांचा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि नामवंतांचा...

कागदावर शिक्षित पिढी! – रंगनाथ पठारे

रंगनाथ पठारे यांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात मोलाचे योगदान आहे. ते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 साली स्थापन झालेल्या अभ्यास समितीचे अध्यक्ष होते. ते मूलत: कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही त्यांची महाकादंबरी आहे, जी मराठा समाजाच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडते. त्यांनी संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सदतीस वर्षे अध्यापन केल. पठारे म्हणजे विचार, संवेदना आणि शैली यांचा त्रिवेणी संगम. शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र...

महापालिकेत मराठी : मृणाल यांची मोहीम (Marathi in Municipal Corporation of mumbai : Mrunal...

मी वसुधा सहस्रबुद्धे. माझे माझ्या देशावर, महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम आहे. परंतु मधल्या काळात राजकारणात इतक्या विचित्र अनाकलनीय घटना घडल्या, की मला भारतीय नागरिक म्हणून वाईट वाटले. त्यावेळी जनसेवेचे व्रत घेतलेल्या मृणाल गोरे यांची आठवण झाली. सध्याच्या तरुण पिढीला गोरे यांच्या निःस्पृह, निर्भय व आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून द्यावी असे वाटले. अशा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा परिचय एकपात्री प्रयोगातून सर्वांसमोर मांडावा असा प्रयत्न आहे. मनात असा विश्वास वाटला, की आजही एखादे असे व्यक्तिमत्त्व निर्माण होईल, की जे सर्वांना एकत्र घेऊन फक्त जनतेसाठी काम करेल ! त्यामुळेच मी मृणाल गोरे यांचे संघर्षपूर्ण जीवन काही प्रसंगांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे...

मराठी कम्युनिटी

मराठी (व एकूणच स्थानिक) भाषा व संस्कृती ही मुळात टिकणार कशी हा प्रश्न जाणकार (मराठी) जनांना भेडसावत असतो. त्याच बरोबर भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनाच्या गोष्टीही काही डोक्यांत असतातच. त्याकरता क्रियाशील मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या तऱ्हांची कामे करत असतात. मराठीतील पाच संस्थांमार्फत आम्ही असे ठरवत आहोत, की जगातील साऱ्या कर्तबगार मराठी जनांना, त्यांच्या कार्याला एका सांस्कृतिक दुव्याने जोडून घ्यावे – त्यांच्याकडील माहितीचे व ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे आणि अशा तऱ्हेने मराठी माणसाचे शक्तिसामर्थ्य प्रकटावे...

मराठी जगवायची कशी, विस्तारायची कशी?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या प्रसारासाठी पुढाकार घेऊन जबाबदारीने सातत्यपूर्ण काम करण्याची गरज आहे. ह्या दृष्टीने मुंबई येथील सोमैया विद्यापीठात, भाषा आणि साहित्य तसेच ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विदयमाने ‘मराठी जगवायची कशी, विस्तारायची कशी?’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मराठी भाषेतून संभाषण व संवाद करणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. त्यामुळे तसे प्रयत्न करावेत व मराठीचा विस्तार साधावा असा अभिप्राय व्यक्त झाला. या कार्यशाळेला एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली...

अलिबाग नावाचा शोध !

अलिबाग ह्या शहराच्या नावाची व्युत्पत्ती बायबलमध्ये सापडते ! पण इतिहासाचा प्रवास अनेकदा असा अनाकलनीय असतो. ‘उत्पत्ती’ नावाचे बायबलचे पहिले पुस्तक आहे. आदाम आणि एवा ह्यांची गोष्ट त्यात आहे. आदाम हा आदिपुरुष आणि एवा ही आदिमाता. त्यांचे दोन मुलगे म्हणजे काईन आणि आबेल. काइनने (थोरला) रागाच्या भरात आबेलचा खून केला ! बंधुप्रेम आदी मूल्ये अस्तित्वात येण्याआधीची ही गोष्ट आहे. तेव्हा राज्य द्वेषाचे होते. नंतर आदामाला अनेक अपत्ये झाली, त्यांतील सेथ हा ज्येष्ठ...