‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून मोठी निराशा झाली. एवढा मोठा निर्मिती खर्च करून साधी उत्तम डॉक्युमेंटरीदेखील तयार होऊ शकली नाही. …..

सुबोध भावे स्त्री भूमिकांत फार सुरेख दिसतो, परंतु गंधर्वांसाठी त्यांनी जे बेअरिंग घेतले ते योग्य आहे का? ‘देवा’, ‘मायबापा’ हे शब्द बालगंधर्वांच्या व्यक्त्तिमत्त्वाशी जोडले गेले आहेत. भावे बालगंधर्वांचे संभाषण सॉफ्ट आवाजात करतात, परंतु त्यात गोडवा बेताचाच जाणवतो आणि आर्तता-करूणा तर अजिबात नसते. सुबोधला कोणीतरी चांगला दिग्दर्शक भेटायला हवा होता.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नितीन देसाई हा परवलीचा शब्द झाला आहे. त्यांनी सेट उत्तम उभारावे, परंतु त्यांना दुसर्या क्षेत्रात उतरायचे असेल तर त्यांनी आधी ‘होमवर्क’ करावे, योग्य व्यक्त्तींचा सल्ला घ्यावा. पान-पानभर जाहिरातींनी व वातावरण निर्मितीने, प्रेक्षक भुलले खरे, परंतु जाणकार प्रेक्षक नंतर खंतावलेदेखील.
– दिनकर गांगल
-संपादक
www.thinkmaharashtra.com
दिनांक – 20.05.2011
{jcomments on}