Home कला

कला

हृदय सजल करणारा- राग हंसध्वनी

0
माझी आच संगीतातील हंसध्वनी रागाकडे नाळ बांधल्याप्रमाणे घट्ट जोडलेली आहे. हंसध्वनीवर आधारलेली लकेर वा धून कानावर पडली की आत काही तरी कारंज्यासारखे थुईथुई उल्हसित झाल्यासारखे वाटते. हंसध्वनी राग वृक्षासारखा डोलारा असावा असा नाही. लिंबाच्या झाडासारखा असेल. पिंडातील आतील काही रसायने वा प्लेट्स ‘हंसध्वनी’च्या स्वरांना चुंबकीय गतीने आकर्षित व्हाव्यात तसे मला होते. जीव मोहरून जातो. हंसध्वनी हे नावच मला आवडते. हंस म्हणजे आत्मा. हंस-ध्वनी म्हणजे आत्म्याचा ध्वनी, आतील आवाज असा अर्थ. हंसध्वनी आणि शंकरा हे राग एकमेकांपासून वेगळे ओळखण्यास सोपे नाहीत...

सोहनी झालासे कळस

सोहनी हे नाव किती छान आहे ! अनेक चिजांमध्ये ‘सोहनी सूरत’ असा वापर आढळतो. या नावाच्या अर्थाप्रमाणेच सोहनी ही अत्यंत ‘सुहावनी’ रागिणी आहे. रागिणी अशासाठी म्हटले, की तिचा जीव लहान आहे. मैफलीमधील तिचा वावर अल्पकाळासाठी असतो; पण प्रभाव मात्र दीर्घकाळ टिकणारा असतो. पतीच्या किंवा प्रियकराच्या वागण्याने दुखावलेली, त्रासलेली आणि त्यामुळे क्रुद्ध अशी नायिका मुळूमुळू रडत बसण्यापेक्षा जेव्हा स्पष्टपणे नायकाला त्याच्या वर्तनाचा जाब विचारते; तेव्हा सोहनीचे सूर सापडतात. अश्विनी भिडे-देशपांडे सोहनीची तुलना द्रौपदीशी करतात...

बिहाग आणि मारु बिहाग

माझी आजी बिहागमधील ‘बालम रे मोरे मनकी’ ही बंदिश गुणगुणत असे. आजी मूलतः ग्वाल्हेरची आणि गाणे शिकलेली ! त्यामुळे ती अनेक पारंपरिक चिजा गात असे. अकरावी-बारावीमध्ये असताना अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गायलेली ‘लट उलझी सुलझा जा बालम’ ही चीज ऐकली आणि मी बिहागशी पुन्हा जोडला गेलो. त्या चिजेतील नाजूक शृंगार विविध स्वरावली आणि बोल यांच्याशी खेळत फुलवला आहे. साहजिकच, त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावर होतो; ती अश्विनी भिडे-देशपांडे, किशोरी आमोणकर आणि मोगूबाई कुर्डीकर या सगळ्यांनी त्यांच्या परीने ‘बाजे री मोरी पायल झनन’ हा ख्याल मांडला आहे आणि बिहागचा सुरेख आविष्कार उभा केला आहे...

संधीप्रकाश राग- पूरिया धनाश्री आणि गौरी

मास्टर दीनानाथ यांच्या शिष्याला तो गात असलेल्या पूरिया धनाश्रीच्या ख्यालामध्ये होणारी चूक लहान वयाच्या लता मंगेशकर यांनी समजावून सांगितली. दीनानाथांनी ते पाहिले आणि दुसऱ्या दिवसापासून लता मंगेशकर यांची तालीम सुरू केली. तो राग होता पुरिया धनाश्री ! आणि ख्याल ‘सदारंग नित उठ’ हा तो ! स्वतः लता मंगेशकर यांनी अनेक मुलाखतींमध्ये तो गुणगुणून दाखवला आहे. त्या किश्शामुळे मला पूरिया धनाश्रीबद्दल लहानपणी कुतूहल होते, पण मी तो कधी ऐकला मात्र नव्हता. मी त्या रागाचे सूर पहिल्यांदा जेव्हा शिकलो तेव्हा मात्र मोहित झालो. तोवर शुद्ध स्वरांचे बरेच राग परिचयाचे झाले होते...

केल्याने केशकर्तन ! – नंदन कालेकरांची किमया

नंदन सखाराम कालेकर या जेमतेम तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिकलेल्या गृहस्थाने 1930 च्या काळात मोठी झेप घेतली. त्याने इंग्लंडला जाऊन केशकर्तन कलेचे आधुनिक शिक्षण घेतले आणि परत मुंबईला येऊन केस कापण्याचे दुकान थाटले ! नंदन कालेकर यांचे आईवडील लहानपणीच निवर्तले. त्यांना उदरनिर्वाहासाठी एका केशकर्तनालयात महिना दोन रुपये पगारावर नोकरी करावी लागली. योग असा, की तेथेच त्यांना वाचनाची आवड लागली ! ते ‘किर्लोस्कर’ मासिकाचे वर्गणीदार 1931 साली झाले. त्या सुमारास त्यांचे मामा श्रीधरपंत देवजी माठे हे इंग्लंडला जाऊन आले होते. माठे हे कालेकर यांना त्यांच्या नाभिकव्यवसायासंबंधी कल्पना व सूचना देत असत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नंदन यांनाही इंग्लंडला जावेसे वाटू लागले...

सारंगाच्या छायेत

सारंग हे नावच किती मोहक आहे ! जसे नाव तसा राग आहे. त्याचा आवाकाही फार मोठा आहे. ऊन चढल्यावर मध्यान्ह येते; त्या वेळच्या रागांमध्ये सारंगाचा वावर आहे. जेव्हा केवळ ‘सारंग’ असा उल्लेख होतो; तेव्हा त्याचा इशारा हा वृंदावनी सारंग रागाकडे असतो किंवा सारंग या रागांगाकडे असतो. रागांग म्हणजे अशी स्वराकृती की जी सगळ्या सारंग प्रकारांचे ‘सारंग’पण निश्चित करते. अशा एकापेक्षा जास्त स्वराकृतीही असू शकतात. त्या एखाद्या रागाला सारंगाचा प्रकार म्हणता येण्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, सा रे म प नी, म ऽ रे नि ऽ सा, रेम रेसा निसा इत्यादी. सारंगाच्या विस्तीर्ण परिवारातील मुख्य सारंगांचे तीन प्रकार - वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि मधमाद सारंग ...

हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल ! – परिचर्चा

जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता...

नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय

नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्याकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे...

महिला मल्लखांबाचे प्रवर्तक म.द. करमरकर (M D Karmarkar took Mallakhamb to women’s world)

0
मल्लखांब दिन 15 जून रोजी साजरा होतो. योगायोगाची बाब म्हणजे तो दिवस वैद्य म.द. करमरकर यांचा स्मृतिदिन असतो. करमरकर हे मिरजेचे. त्यांनी एक वैद्य या नात्याने महिलांना मल्लखांब शिकवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुर्वेद संशोधनाचा तो विषय बनवला. त्यांनी स्वत:च्या सहा व चार वर्षांच्या कन्यांना आणि पत्नीला त्या प्रयोगाचा भाग बनवले ! त्यांचा तो निर्णय 1944 साली धाडसाचा होता. मिरजेसारख्या निमग्रामीण भागात पत्नीला नऊवारी पातळावर व दोन मोठ्या मुलींना शर्ट-हाफपॅण्टवर धावण्याच्या सरावास सोडणे, त्यांच्या आहारावर काटेकोर लक्ष ठेवत - त्यांचा चहा बंद करून त्यांचे दूध पिण्याचे प्रमाण वाढवणे...

गौडमल्हार म्हणजे प्रेमाचा पाऊस ! (Classical Gaud Malhar Is Full of Love !)

गौडमल्हारचा परिचय तसा उशिराच झाला ; पण पहिल्या श्रवणापासून जिवाभावाचा बनलेला तो खास आवडता राग ! किशोरी यांची स्वरचित ‘बरखा बैरी भयो’ ही रचना माझ्या सर्वाधिक प्रिय रचनांपैकी एक ! त्यातील ‘जाने ना देत मोहे पी की नगरिया’ या ओळीतील भाव थेट हृदयाला भिडणारा आहे. त्यामधून प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यातील असा क्षण आठवेल, की प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकली नाही याची हुरहूर मनाला लागून राहील. भावनांचे किती असे नाजूक पदर ...