सुवर्णमहोत्सव संपला!

0
22

     संयुक्त्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष एक मे रोजी संपले. संयुक्त्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्द्ल आस्था बाळगणार्‍या काही मंडळींनी प्रदर्शने भरवली, सांस्कृतिक कार्यक्रम योजले. त्याच वेळी ….


      संयुक्त्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष एक मे रोजी संपले. संयुक्त्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्द्ल आस्था बाळगणार्‍या काही मंडळींनी प्रदर्शने भरवली, सांस्कृतिक कार्यक्रम योजले. त्याच वेळी बेळगाव-कारवार सीमाभागातील मंडळी मुंबईत लाक्षणिक उपोषणास बसली होती. या वर्षभरात काय घडले याबद्द्ल.

     सांगलीचे पी.बी पाटील यांनी सिंहावलोकन परिषदांचा उपक्रम हाती घेतला आहे.

     वर्षभरात काही महत्त्वाची प्रकाशने झाली, त्यांचा आढावा मदन धनकर यांनी घेतला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयुक्त्त महाराष्ट्र कशासाठी याबाबतचे समित्रीचे स्थापनेवेळचे निवेदन – मूळ स्वरूपात सादर केले आहे.

{jcomments on}

About Post Author

Previous articleमहाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
Next articleज्याचा त्याचा विठोबा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.