बाळशास्त्री जांभेकरांपासून बाबासाहेब आंबेडकरापर्यंतचा काळ महाराष्ट्रात प्रबोधन काळ म्हणून मानला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील बौद्धिकता लोपली आणि तेथे बुद्धिमांद्य पसरले. त्याचे एक उघड कारण त्या कष्टमय काळातील भौतिक विकासाची गरज हे होते. त्यामुळे सुशिक्षित समाज उद्योग-व्यवसायाच्या, करियरच्या पाठी लागला. त्यात बूडून गेलां परंतु गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अनेक नंव नवीन ज्ञानशाखांचा उदय झाला. सुशिक्षित मंडळी त्यांना कौशल्याने सामोरी गेली. प्रश्नांचा उत्तरे शोधण्याच्या जुन्या पद्धती, जुने वाद, जुने इझम काळाच्या पडद्याआड झाले. मात्र या ओघामध्ये बौद्धिक, वस्तुनिष्ठ, विवेकपूर्ण चर्चा मंदावल्या. साद वैचारकत्तेला या विभागामधून बुद्धिगम्य वातावरणाला वाव देण्याचा प्रयत्न असणार आहे. समकालीन सामाजिक, सांस्कृतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर येथे दर आठवड्याला एक ना दोन टिपण वितरीत केली जाईल आणि त्यावर मते-मतांतरे व्यक्त होत राहतील. ह्या चर्चेत रूढ धर्तीचा विचारांना फारसा वाव दिला जाऊ नये असा प्रयत्न आहे.


