मोरारजींचा वाढदिवस…

0
24

अत्रे टीका करताना विरोधकांची सालडी सोलत असले तरी त्यांच्या स्वभावात दीर्घ द्वेष नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पंडित नेहरूंची रेवडी उडवणारे अत्रे, नेहरूंच्या निधनानंतर अग्रलेखांची मालिका लिहितात, ज्यातून 'सूर्यास्त' सारखे ह्रदयस्पर्शी पुस्तक तयार झाले, पण अत्र्यांचा शेवटपर्यंत राग राहिला तो मोरारजी देसाईंवर.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे यांना तुरुंगवास घडला. ते अडीच महिने तुरूंगात होते. 29 फेब्रुवारी हा मोरारजींचा वाढदिवस. मोरारजींचा साठावा वाढदिवस 1956 साली होता. 29 फेब्रुवारी ही तारीख दर चार वर्षांनी येते. त्यामुळे साठ वर्षांच्या आयुष्यात मोरारजींचे पंधरा वेळा वाढदिवस झाले. त्याचा अर्थ अत्र्यांनी काढला तो अफलातून. मोरारजींचे शरीर जरी साठ वर्षांचे असले, तरी बौध्दिक वय पंधरा वर्षोंचे आहे! तेंव्हा त्यांचा वाढदिवस साजरा केलाच पाहिजे' असे अत्र्यांनी ठरवले. पण त्या वेळी ते ठाण्याच्या तुरुंगात होते. म्हणून अत्र्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी कावळ्यांना जिलबी खायला घालून वाढदिवस साजरा करायचे ठरवले!

त्याप्रमाणे तुरुंगाच्या कँटिनमधून ताटभर जिलेबी विकत आणली, त्यानंतर अत्र्यांनी त्या कावळयांसमोर जे भाषण केले ते वाचण्यासारखे आहे. (काव!काव!!, किलकिलटासह) त्या नंतर कावळ्यांच्या दिशेने जिलेब्या फेकल्या गेल्या. ताटभर जिलेबी त्या काक मंडळींनी फस्त करून टाकली.

Last Updated On – 1 May 2016

About Post Author