मंगळवेढ्याची महासाध्वी गोपाबाई आणि तिची विहीर

0
49

मंगळवेढा परिसरात शके 1376 ते 1378 या काळात भीषण दुष्काळ पडला होता. तेथे एका सधन कासाराने मंगळवेढ्याच्या पूर्वेस एक मोठी विहीर खोदली पण पाणी लागले नाही. त्याला एका योग्याने सांगितले, की तुझ्या थोरल्या सुनेला (बाळंतिणीला) बाळासकट विहिरीत सोड तर पाणी लागेल. कासाराने विहिरीत बांधकाम करून तिला राहण्यासाठी विहिरीच्या आतल्या बाजूस खोली बांधून तेथे तिच्या राहण्याची व्यवस्था केली – भांडी, पाळणा, उखळ, पाटा-वरवंटा इत्यादी साधनेही ठेवली. थोरली सून तयार झाली. तिला त्या खोलीत सोडल्यावर कासार (सासरा) वर येऊ लागला. त्याने पाण्याचा खळखळाट ऐकून मागे वळून पाहिले. तर सात पायऱ्यांपर्यंत पाणी वर आलेले त्याला दिसले, पण पाणी येताना तेथेच थांबले होते. अजूनही त्या पायरीच्या वर पाणी येत नाही असे म्हणतात. तीच ती सुनबाई (गोपाबाईची) विहीर. विहिरीच्या बाजूला कथेचा फलकही लावलेला आहे!

-राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे

About Post Author

Previous articleसंत दामाजी पंत
Next articleपनवेलचा कर्नाळा किल्‍ला
राजा पटवर्धन हे ‘थिंक महाराष्ट्र‘च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध‘ मोहिमेत कार्यकर्ते म्हणून सामील होते. त्यांचे अणुशक्तीवर ‘जैतापूरचे अणुमंथन’ हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाला राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे अलीकडेच ‘पुनर्शोध महाभारता‘चा पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. राजा पटवर्धन यांचा जन्‍म जैतापूरच्या प्रकल्प परिसरातील जानशी गावातला. त्यांनी शिक्षण झाल्यानंतर रासायनिक उद्योगात नोकरी केली. ते कोकण विकास, देशापुढील आर्थिक प्रश्न आणि विशेष करून ऊर्जा समस्या यांबद्दल लिखाण व व्याख्याने करत असतात.