Home Tags Ratnagiri

Tag: Ratnagiri

आमची कशेळी – शहरी वातावरणापासून दूर !

कशेळी हे कोकणातील रत्नागिरीजवळचे जुने प्रसिद्ध गाव. ते कऱ्हाड्यांचे गाव असेही म्हणत. तेथील पाच ‘क’ प्रसिद्ध आहेत, म्हणे. त्यांतील एक ‘क’ कऱ्हाड्यांचा. गावगाथा या ‘थिंक महाराष्ट्र’च्या लोकप्रिय सदरासाठी लेखन शोधत असताना न्यूयॉर्कचे जयंत कुळकर्णी यांच्यापर्यंत पोचणे झाले आणि खजिनाच हाती आला. जयंत स्वतः उत्साही लेखक-संकलक. त्यांचे वडील वि.ह. हे समीक्षक कुळकर्णी वर्गातील. पण वि.ह. ललित लेखनही उत्तम लिहीत. त्या वि.ह. यांनी त्यावेळच्या साहित्यिक समीक्षकांची ट्रीप कशेळीला नेली होती. तिचे वर्णन अनंत काणेकर यांनी करून ठेवले आहे. कुळकर्णी पितापुत्र यांनी कशेळीबद्दल लिहिले आहे...

कशेळी : उगवत्या सूर्याचे गाव

कशेळी हे उगवत्या सूर्याचे गाव समजले जाते. एका बाजूला पसरलेला अथांग व विस्तीर्ण अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला डोंगरात विसावलेले निसर्गरम्य, हिरवेगार असे शांत गाव. लाल मातीची चिरेबंदी कौलारू घरे, बाजूला असलेल्या कळंब्यांच्या विहिरी, गुरांचे गोठे, खोप्या, झोपाळे, शेणाने सारवलेल्या पडव्या व पुढे-मागे प्रशस्त आगर असा गावचा डौलदार थाट. बैलगाड्या हे सर्वांच्या घरचे वाहन असे. कशेळीला भाऊच्या धक्यावरून बोटीने किंवा एसटीने जावे लागत असे. तो अनेक तासांचा खडतर प्रवास असे. बोट मुसाकाजी येथे किंवा पूर्णगड बंदराजवळ लागे...

कशेळीचे आम्ही कुळकर्णी

आमच्या कुळकर्णी घराण्याची श्रीमंती खूप होती. त्याची ख्याती जंजिऱ्यापर्यंत पोचली होती. सिद्दी चाचे लुटमार करण्याकरता कशेळी येथे 1870 साली समुद्रावरून आले होते. त्यांनी वाड्यात येऊन स्त्रियांच्या वस्त्रांसकट दागदागिन्यांची लुटमार केली होती. मात्र, एका धाडसी कुळकर्णी महिलेने हाताला लागेल तेवढे सोने अंगावर घालून जवळच्या विहिरीत उडी मारली. ती चाचे जाईपर्यंत तेथेच दडून बसली होती. त्यामुळे ती वाचली. तिच्या अंगावर सोने इतके होते, की त्यातून मिळालेल्या पैशांवर पुढे कुळकर्ण्यांच्या चार पिढ्या जगल्या. परंतु श्रीमंती गेली होती...

देवीहसोळची देवीभेट कातळशिल्पावर

कोकण हा पुरातत्त्व शास्त्रासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर, लांजा आणि देवगड या तालुक्यांच्या पट्टयात जमिनीतून, अचानक वर यावीत तशी कातळशिल्पे-शिल्पचित्रे-खोदचित्रे (Petroglyph) गेल्या काही वर्षांत समोर आली ! रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळपास दोनशेऐंशीपेक्षा जास्त कातळशिल्पे सापडली आहेत. आमच्या कशेळी व राजापूर या भागांत देवाचे गोठणेजवळ ही भव्य कातळशिल्पे सापडली, त्याची ही माहिती…

अमृत्या – आमच्या कशेळीचा फणस

माझे आजोबा म्हणत, ’अमृत्या खाशी, त्याची कीर्ती वीस कोशी’. दरवर्षी त्याला खूप फणस लागतात. हा लाल मातीचा गुण असावा. कशेळी गाव तिन्ही बाजूंनी पसरलेल्या अथांग अरबी समुद्राच्या कुशीत उतरत्या डोंगरात शांत वसलेले आहे. त्या गावात 1661 मध्ये शिवाजी महाराजांचे आगमन झाले होते ! गावात कऱ्हाडे ब्राह्मणांची वस्ती जास्त आहे. आमच्या आगरातील बरक्या फणसाचे वैशिष्टय असे, की त्याचे गरे रसाळ व चवीला अमृतासारखे गोड लागत. म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याला ’अमृत्या’ असे योग्य नाव दिले होते...

श्रमिक सहयोगची प्रयोगभूमी ! (Prayogbhumi – Chiplun Institution for Adiwasi Education)

चिपळूणचे राजन इंदुलकर ‘प्रयोगभूमी’ नावाचा आदिवासी शिक्षणाचा प्रयोग करण्यात गुंतले आहेत; त्यालाही वीस वर्षे झाली. ते चिपळूण तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात कोळकेवाडी येथे पोचले व तेथे ‘श्रमिक सहयोग’चे काम सुरू केले. संस्थेमार्फत शिक्षणापासून वंचित अशा धनगर, कातकरी आणि आदिवासी मुलांना नावीन्यपूर्ण पद्धतीचे शिक्षण देण्यावर त्यांचा भर आहे. ती मुले शिक्षणापासून वंचित होती; त्यांना प्रयोगभूमीमुळे शिक्षण सुविधा प्राप्त झाली. प्रयोगभूमी डोंगरउतारावर वसलेली आहे. संस्थेच्या सोळा एकर क्षेत्रापैकी सत्तर टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. तेथे दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने पाण्यावरील वीज वापरली जाते. उर्जा स्वावलंबनाचा विचार पसरावा म्हणून दरवर्षी ऑगस्टमध्ये तेथे ‘चला वीज बनवुया’ कार्यक्रम साजरा केला जातो...

त्सुनामी केळशीची (Tsunami of Kelshi)

कोकण किनाऱ्यावरील केळशीला पाचशे वर्षांपूर्वी, 1524 साली त्सुनामीने तडाखा दिला होता. त्यात सारे गाव उद्ध्वस्त झालेच, परंतु त्यातून केळशीच्या सागर किनाऱ्यावर वाळूचा बंधारा उभा ठाकला तो आजतागायत. वादळातील समुद्र लाटांचे तांडव शांत झाले. गावात आलेले समुद्राचे पाणी खाडीत वाहत जाऊन परत समुद्राला मिळाले. वाळूचा तो ढिगारा मात्र जमिनीवर राहिला – एक हजार मीटर लांब, अठरा मीटर उंच ! मात्र कालपरत्वे वारा, पावसामुळे त्याची झीज होऊन तो अठरा मीटर उंचीचा आठ मीटर झाला आहे. त्या आपत्तीची नोंद अधिकृत शाही वा नंतरच्या ब्रिटिश दफ्तरांत आढळत नाही. मात्र वास्को द गामा या खलाशाच्या नोंदीत त्या वादळाचे वर्णन व संदर्भ मिळाले आहेत...

गुडघे गावचा ग्रामोदय

दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत...

आठवणीतले वाटूळ

वाटूळ हे वारकऱ्यांचे गाव ! पवित्र तो देश, पावन तो गाव | जेथे हरीचे दास जन्मा येती || आषाढी-कार्तिकी पायी वारी. कीर्तनात रममाण होऊन नाचणारे कीर्तनकार आणि कीर्तन ऐकण्यासाठी जमलेले आबालवृद्ध... माझ्या आजी, काकी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन कीर्तनात तल्लीन झालेल्या आठवल्या की जाणवते तोच खरा वाटूळगावचा इतिहास ! निसर्ग म्हणजे काय हे कळण्याइतके वय नव्हते तेव्हा ! पण पाखरांचा किलबिलाट, ऋषीमुनींप्रमाणे ध्यानस्थ बसलेले डोंगर आणि मध्येच झुळझुळ वाहणारी नदी दिसली की मन प्रसन्न होत असे. तांबडे फुटले, की पूर्व दिशा उजळून निघायची आणि थोड्याच वेळात ताऱ्यांचा लालभडक सखा डोके वर काढायचा... अहाहा !! खूप सुंदर सूर्योदय ...

वाटूळ ! (Watul Village)

विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची माहिती दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच...