Tag: Konkan
निसर्गाने वेढलेले देवरुख (Devrukh)
देवरूखबद्दल असे सांगितले जाते, की प्रत्यक्ष देवांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली आहे! बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख! देवरुख या गावाचा तालुका संगमेश्वर असला तरी तालुक्याचे गाव म्हणून ओळख आहे ती देवरुख ह्या शहराचीच; असे महत्त्व त्या शहरास लाभले आहे. देवरूख या नावाची उत्पत्ती आणखी एका पद्धतीने आहे. वड आणि पिंपळ यांची मोठमोठी झाडे त्या गावाच्या चारही बाजूंना आहेत. वड आणि पिंपळ यांना भारतीय संस्कृतीत ‘देववृक्ष’ मानले जाते. ‘देववृक्षांचे गाव’ याचा अपभ्रंश होत होत गावाचे नाव ’देवरूख’ झाल्याचे सांगितले जाते...
रवळनाथ – लोकदेव व क्षेत्रपाळ
यक्षदेवता व वीरयक्ष हेच दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव मानले जातात, ते गावाचे संरक्षण करतात ही लोकांची श्रद्धा आहे. यक्षोपासनेची चिवट...
पुस्तकवेडे गायकरकाका!
दत्ताराम गायकर हे मुळचे कोकणातील. ते त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईतील चुनाभट्टी येथील किसन बापू चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात. पत्नी, मुलगा, सून, एक नातू...
निसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर
विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे 'संस्कृतिकोशा'चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद...
कोकणातील गाबित शिमगोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...
कोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...
स्नेहदीप
कर्णबधीर कळ्या-फुलांचे ‘आनंदी झाड’!
‘शिकविता भाषा बोले कैसा पाही,
कानाने बहिरा मुका परी नाही’
ही काव्यपंक्ती शब्दश: खरी करत कर्णबधीर चिमुरड्या कळ्या-फुलांसाठी आनंदाचे झाड बनण्याचे काम दापोलीतील...
दिलीप पांढरपट्टे – समृद्ध जाणिवांचा गझलकार
मराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात...
आंदोलनाची धगधगती सुरुवात!
सचिन रोहेकर यांची पत्रकारितेत चौदा वर्षे व्यतीत झाली आहेत. त्यांनी कोकणात होऊ घातलेले प्रकल्प तेथील पर्यावरणाला तसेच भूमिपुत्रांना कसे घातक आहेत हे परिसराचा, माणसांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून मांडले आहे. त्यात वृत्तपत्रासाठी केलेले लेखन, त्याचप्रमाणे कोकणाच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा समाविष्ट आहे...