Home Tags वामन मल्हार जोशी

Tag: वामन मल्हार जोशी

त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)

कुसुमावती देशपांडे यांची कवयित्री, कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…

बत्तिसावे साहित्य संमेलन (Thirty-Second Marathi Literary Meet – 1949)

बत्तिसावे साहित्य संमेलन पुणे येथे 1949 साली झाले. त्याचे अध्यक्ष ‘आधुनिक भारत’कार आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर हे होते. ते 1920 च्या महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत एम ए चा अभ्यास अर्धवट टाकून पडले. त्या वेळी भारतीय राजकारणात टिळकयुग संपून गांधीयुग सुरू झाले होते. जावडेकर यांनी स्वतःला महात्मा गांधी यांच्या विचारप्रणालीत झोकून दिले होते. ते गांधीवादाचे भाष्यकार म्हणूनच ओळखले जात...

सोळावे साहित्यसंमेलन (Sixteenth Marathi Literary Meet – 1930)

मडगाव (गोवे) येथे भरलेल्या सोळाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘रागिणी’कार वामन मल्हार जोशी. कादंबरीकार वि.स.खांडेकर यांनी वामन मल्हार यांचा ‘नैतिक उंचीचा आदर्श’ असा उल्लेख केला होता. वामन मल्हार यांचे सर्व साहित्य हे सजीव ध्येयवादाने भारलेले आणि विचारांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या कादंबऱ्यांतून नवी स्त्री आणि स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली आहे...