एकावन्नावे साहित्य संमेलन (Fifty First Literary Meet 1975)

कराड येथे 1975 साली भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांना लाभला. दुर्गाबाई लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधकसमाजशास्त्रमानववंशशास्त्र व बौद्ध धर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या होत्या. त्यांचा जन्म इंदूर येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंढरपूरचे. ते नंतर बडोद्याला स्थायिक झाले. त्याकाळी बडोदा हे भारतातील एक संस्थान होते. दुर्गाबाईंचे कुटुंब सुशिक्षित होते. वडील शास्त्रज्ञ होते आणि त्यांची बहीण कमला सोहोनी भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत.

दुर्गाबाईंचे शालेय शिक्षण मुंबईनगरनासिकधारवाडपुणे येथे झाले. त्या मॅट्रिक उत्तीर्ण 1927 साली झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई) येथे झाले. त्या बी ए (संस्कृत व इंग्रजी) 1932 मध्ये पहिल्या वर्गात पास झाल्या. त्यांनी शिक्षण काही काळ स्थगित करून महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता (1929). त्या एम ए 1935 मध्ये झाल्या. त्यासाठी त्यांनी इंडियन कल्चरल हिस्टरी’ शाखेत अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रुडन्स’ या विषयावर प्रबंधलेखन केले. त्यांनी पीएच डी च्या प्रबंधासाठी सिंथिसीस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिंन्सेस ऑफ इंडिया’ या विषयावर संशोधन कार्य केलेपरंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधीटॉलस्टॉयहेन्री डेव्हीड थोरोमिलरॉबर्ट ब्राउनिंगराजारामशास्त्री भागवतडॉ. केतकर ही दुर्गाबाईंची प्रमुख प्रेरणास्थाने होत.

त्या गोखले अर्थशास्त्र संस्था (पुणे) येथे 1958 ते 60 अशी दोन वर्षे समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी होत्या. त्यांनी साहित्य-सहकार ह्या मासिकाचे वर्षभर (1957) संपादनही केले. त्यांनी संशोधन-लेखन यांसाठी नोकरी व्यवसायापातून मुक्तता घेतली. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स (1938) हा होता. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ राजारामशास्त्री भागवत हा होय. व्यक्तिचित्र व वाङ्मयविवेचन (1947) आणि पहिला मराठी ललित ग्रंथ महानदीच्या तीरावरगोंड जीवनावरील नवलिका-(1956) हा होय. त्यांना ललित लेखनाची प्रेरणा साने गुरूजींकडून मिळाली असे त्या म्हणत.  

दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ संशोधनपर वैचारिक लेखनाने केला. त्यांचे समाजशास्त्रमानववंशशास्त्रलोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. भाषाशास्त्रावरील ‘ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी’ (1940) बौद्ध व जैन धर्माच्या अभ्यासात हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित ‘रोमान्स इन सॅक्रिड लोअर’ (1946) मानववंशशास्त्राचे परिचायक ए प्राइमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी (1950) भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर (1956) व रिडल इन इंडियन लाइफ हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ. त्यांचे बरेचसे महत्त्वाचे लेखन लेखरूपांतही आहे. हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी (1947) हा डॉ. केतकर यांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होय.

त्या मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या सक्रिय सभासद होत्या. त्यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाचे संस्कृत भाषांतर केले. त्यांच्या लोकसाहित्याने मराठी साहित्यात व लहान मुलांच्या कथांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले. त्यांच्या तुळशीचे लग्नचंद्रलेखा आणि आठ चोरवनवासी राजपुत्र या कथा मुलांमध्ये प्रिय होत्या. त्यांच्या मृत्युपश्चात वर्ल्ड पब्लिकेशनने त्यांची चार पुस्तके प्रकाशित केली. त्यामध्ये त्यांच्या उच्च साहित्यमूल्ये असलेल्या लेखांचा समावेश होता. त्याचे संपादन व संकलन मीना वैशंपायन यांनी केले आहेमराठी सारस्वतांची सरस्वती’ या नावाने दुर्गाबाईंचा गौरव झाला. त्यांनी लिहिलेल्या ललित पुस्तकांपैकी व्यासपर्वऋतुचक्रडूबभावमुद्रारूपरंगखमंगसत्यम शिवम सुंदरमकेतकी ही कादंबरीगोधडीदुपानीशोध रामायण इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. निसर्गोत्सव आणि पैस या पुस्तकाला तर 1971 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे संस्मरणीय काम म्हणजे त्यांनी लिहिलेले ऋतुचक्र हे पुस्तक. दीर्घकाळ चाललेल्या आजारपणातून हळूहळू सावरताना त्यांनी टिपलेले सर्व ऋतूंतील बदल त्या पुस्तकात आहेत.

दुर्गा भागवत या त्यांच्या लेखनातून सृष्टीच्या निसर्गचक्रानुसार बदलत जाणाऱ्या घटनांचे वर्णन करतात. त्यांच्याकडे ललित लेखनासाठी आवश्यक असणारी संवेदनशीलतानिरीक्षणक्षमताचिंतनशीलताकाव्यात्मकता यांचा सुरेख संगम आहे. त्यामुळे त्यांचे ललित गद्य लेखन वेगळे व वाचकप्रिय ठरले.

त्यांनी 1975 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीविरूद्ध स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यांचे म्हणणे आणीबाणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा येते असे होते. त्यांनी साहित्य संमेलनाच्या भाषणात आणीबाणीवर टीका केली. त्या जाहीर विरोधाबद्दल त्यांना अटकही झाली. मराठी साहित्य संमेलनासाठी 1977 साली गोवा सरकारने मदत केली होती. त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांना संमेलनाला बोलावण्याचा निर्णय झाला. मात्रत्यालाही दुर्गाबाईंनी कडाडून विरोध केला. साहित्य आणि राजकारण एकत्र आणू नयेअसे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी भारत सरकारबरोबर असलेल्या मतभिन्नतेतूनच पद्मश्री व ज्ञानपीठ हे दोन्ही पुरस्कार नाकारले.

दुर्गाबाई कायम साहित्य आणि संशोधनात बुडालेल्या असत. त्यांना स्वयंपाक करण्यातही रस होता. त्यांना नवनवीन पदार्थ बनवण्यास व पाककृतींविषयी लिहिण्यास आवडत असे. त्यांनी जगाचा निरोप 7 मे 2002 रोजी घेतला. तेव्हा त्या ब्याण्णव वर्षांच्या होत्या.

संकलन – टीम थिंक महाराष्ट्र

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here