सांस्कृतिक जग कोठे हरवले?
महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?
मौजिबंधन विधी – परंपरा व सद्यस्थिती
विलास पंढरी यांनी ‘मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार – मौंजिबंधन’ नावाचा सविस्तर लेख लिहिला आहे. संस्कार म्हणजे भारतीय संस्कृतीतील वागण्या-बोलण्याचे नीतिनियम. असे सोळा संस्कार भारतीय परंपरेत आहेत. त्यांचा आशय समजून घेणे आवश्यक आहे. व्यक्तीला तो समजला तर त्यानुसार आचरण करून ती स्वत:चे व्यक्तिमत्त्व समृद्ध करू शकते. यानिमित्ताने उपनयन विधी संदर्भात वेगवेगळ्या घटना व विचार यांचे संकलन असलेले चार लेख प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या लिंक लेखांचे पुढे वर्णन आहे त्या ठिकाणी लिंक दिल्या आहेत...
इंदापूरातील खाजगी मालकीची मंदिरे (Private Temples in Indapur)
इंदापूरचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याप्रमाणेच अनेक ब्राह्मण कुटुंबीयांची स्वतःची खाजगी मंदिरे तेथे आहेत.व्यंकटेशाचे मंदिर इंदापूरमधील सर्वात पुरातन आणि श्रीमंत मंदिर असावे...
… बेडेकर मोठे साहित्यिक का? (Why Bedekar is a great writer?)
‘रणांगण’ या एकमेव कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर कोल्हापूरला आले होते. त्यांना विचारलेला एक प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर...
आयत्या बिळावरील जातीय संस्था !
जे वर्षानुवर्षे चालू आहे ते जातीचे मोठेपण आपण कधी घालवणार? ओबीसी, मराठा, कुणबी, धनगर, ब्राह्मण या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जातींच्या पंखांखाली राहून सरकारी फायदे व राजकारणातील जागांवर डोळा ठेवणेच आवडते. त्यासाठी मोर्चे, धरणे करण्यावर त्यांचा भर जास्त असतो. निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी सर्व जाती-धर्मांतील मुलांनी या व्याधीपासून दूर राहून स्पर्धात्मक परीक्षांत पुढे येण्यास पाहिजे...
सालंदार मजूर – वेठबिगारीचे वेगळे रूप (Contract labour, nothing but bonded labour)
शेतमालक त्याच्या शेतात कामावर गावातील गरीब स्त्री-पुरूषांना ठेवतात. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे साधारणपणे तीन प्रकार असत- 1. रोजंदार, 2. महिनादार, 3. सालंदार.
शेतमालक त्याच्या शेतात कामावर गावातील गरीब स्त्री-पुरूषांना ठेवतात. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे साधारणपणे तीन प्रकार असत- 1. रोजंदार, 2. महिनादार, 3. सालंदार.
रमाबाई नगर धारावीच्या दिशेने? (Ramabai Nagar On way to Dharavi?)
समाजात वेगळे वेड घेऊन जगणारी माणसे असतात. तशा चौतीस व्यक्तींचा परिचय 30 एप्रिलपर्यंत 'लॉकडाऊनच्या काळातील धावत्या नोंदी' या शीर्षकाखाली करून दिल्या. त्यांतील काही व्यक्तींच्या कामांना, विचारांना विशेष दाद मिळाली. नोंदी 1 मे पासून थांबवल्या होत्या, तो एकूण परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी...
‘केबीसी’चा घरबसल्या खेळ!
‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम ‘स्टारप्लस’ या हिंदी वाहिनीवर लागत असे. आता, तो ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवर लागतो. त्या कार्यक्रमाची जबाबदारी अमिताभ बच्चन यांच्यावर असे....
चंद्रपूरचे अधिपती धारचे परमार
उपेंद्र हा परमार वंशातील पहिला ज्ञानपुरूष मानला जातो. परमार वंशाचे इसवी सन 1950 नंतरचे अभिलेख आहेत त्यात त्याची कथा दिलेली आहे. भगवान रामाचे गुरू...
केकावली (Kekavali)
‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी. त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या...