सुहासिनी कीर्तिकर
गिरगावची दिवाळी – फराळ, अंघोळ, आकाशकंदिल…
पाठारे प्रभू ज्ञातीचे वास्तव्य दक्षिण मुंबईत प्राधान्याने होते. ते स्वतःला अस्सल मुंबईकर मानतात. त्या ज्ञातीमध्ये वर्षभर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. दिवाळीत पाठारे प्रभू पद्धतीचे सुकडी, तवसे, शिंगडी, भानवले, पंगोजी, मुम्बरे, बुंदीचे कडक लाडू असे पदार्थ केले जात. त्यांच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच तेथील विशिष्ट प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध होत्या. असे म्हणतात, की त्या रांगोळ्या बघण्यास त्या काळी ब्रिटिश अधिकारी घोडागाडीतून येत...
बाळ भालेराव – साहित्य संघाचा प्राण (Bal Bhalerao – Doctor Who Devoted His Life...
विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दादरच्या (मुंबई) राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भरले होते. त्यात एका संध्याकाळी ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक रंगले होते. काम करणारे सगळे होते पत्रकार! दिग्दर्शक होते विहंग नायक. नायिकेच्या भूमिकेत वसुंधरा पेंडसे अन् त्यात छोट्या चंदूची भूमिका केली होती विहंगच्या मुलाने. संमेलनात पत्रकारांचे नाटक असावे ही संकल्पना डॉ. बाळ भालेराव यांची. त्या संबंधातूनच पुढे भालेराव यांनी विहंग यांना साहित्य संघाच्या नाट्यशाखेत ओढून घेतले. वेगळी, अनोखी संकल्पना राबवणे, माणसांना पारखून संस्था मोठी करणे आणि स्वत:च्या डॉक्टरी पेशाचा/पैशांचा आधार नाट्यसृष्टीतील असंख्यांना देणे ही बाळ भालेराव यांची वैशिष्ट्ये...