1 POSTS
राम दोतोंडे हे महावितरण कंपनीतून मुख्य महाव्यवस्थापक म्हणून 2015 साली सेवानिवृत्त झाले. ते मुंबई महापालिका आयुक्त यांचे माध्यम सल्लागार म्हणून जून 2015 पासून कार्यरत आहेत. त्यांचे ‘रापी जेव्हा लेखणी बनते’ (1978) आणि ‘गल्ली बदललेला मोर्चा’ (2000) हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या ‘गल्ली बदललेला मोर्चा’ या कवितासंग्रहाला ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’सह संजीवनी खोजे, लोकायत साहित्य असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी प्रा.ल.बा.रायमाने यांचा ‘आधारस्तंभ’ हा गौरवग्रंथ प्रा.अविनाश डोळस यांच्या सहकार्याने संपादित केला. प्रा.अविनाश डोळस यांच्या ‘डोळस’ या गौरवग्रंथाचेही सह संपादन केले.9833383887