नवशिक्या मुलींना, गृहिणींना आणि पाककला विशारदांना वरदान ठरेल असे पुस्तक 1910 मध्ये प्रकाशित झाले! लक्ष्मीबाई धुरंधर लिखित 'गृहिणी-मित्र अथवा एक हजार पाकक्रिया' हे ते...
उन्हाळा हा ऋतू जरा त्रासदायक वाटला, तरी भारतीय खाद्यसंस्कृतीत त्याची मदत मोठी आहे. वाळवणाचे पदार्थ बनवून त्याची बेगमी करणाऱ्या ललनांची लगबग हे उन्हाळ्याचे वैशिष्ट्य. कुरकुरीत कुरडया, सांडगे, पापड-पापड्या, लज्जतदार मसाले, लोणची, मुरांबे हे सर्व पदार्थ त्या काळात डबाबंद वा बरणीबंद होत असतात. वाळवण संस्कृतीत वैविध्य आहे; प्रांताप्रांतानुसार ते पदार्थ बदलतात. पापडांचा उल्लेख थेट बौद्ध काळापासून आढळतो. सांडगे व पापडाची वर्णने तेराव्या शतकातील कानडी व मराठी साहित्यात ठायी ठायी आहेत...