जयेश जाधव हे मुंबईतील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक आहेत. ते नेहरोली येथे राहतात. ते ‘थिंक महाराष्ट्र’ आयोजित ‘गावगाथा’ स्पर्धेत सहभागी झाले होते.
नेहरोली हे गाव पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील दक्षिण सीमेवर वसलेले आहे. ते पालघर जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण साठ किलोमीटरवर येते. गाव आहे निसर्गरम्य, परंतु औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे गावाचा विकासही साधला गेला आहे.