Home Authors Posts by जयंत कुळकर्णी

जयंत कुळकर्णी

4 POSTS 0 COMMENTS
जयंत विठ्ठल कुळकर्णी हे न्यूयॉर्क येथे राहतात. ते कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर टॉवर पडण्यापूर्वी आणि नंतरचे चित्रण दाखवणारी फिल्म केली आहे. त्यांना जुन्या गाण्यांच्या कॅसेट्स आणि छायाचित्रे जमवण्याचा छंद आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही गाण्याचा संदर्भ मिळू शकतो अशी त्यांची ख्याती आहे. ते मुंबईत असताना त्यांच्याकडे सी. रामचंद्र वगैरे मंडळींच्या मैफली होत. त्यांचे ‘शिवाजी पार्क ते सेंट्रल पार्क’ हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे.

कशेळी : उगवत्या सूर्याचे गाव

कशेळी हे उगवत्या सूर्याचे गाव समजले जाते. एका बाजूला पसरलेला अथांग व विस्तीर्ण अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला डोंगरात विसावलेले निसर्गरम्य, हिरवेगार असे शांत गाव. लाल मातीची चिरेबंदी कौलारू घरे, बाजूला असलेल्या कळंब्यांच्या विहिरी, गुरांचे गोठे, खोप्या, झोपाळे, शेणाने सारवलेल्या पडव्या व पुढे-मागे प्रशस्त आगर असा गावचा डौलदार थाट. बैलगाड्या हे सर्वांच्या घरचे वाहन असे. कशेळीला भाऊच्या धक्यावरून बोटीने किंवा एसटीने जावे लागत असे. तो अनेक तासांचा खडतर प्रवास असे. बोट मुसाकाजी येथे किंवा पूर्णगड बंदराजवळ लागे...

कशेळीचे आम्ही कुळकर्णी

आमच्या कुळकर्णी घराण्याची श्रीमंती खूप होती. त्याची ख्याती जंजिऱ्यापर्यंत पोचली होती. सिद्दी चाचे लुटमार करण्याकरता कशेळी येथे 1870 साली समुद्रावरून आले होते. त्यांनी वाड्यात येऊन स्त्रियांच्या वस्त्रांसकट दागदागिन्यांची लुटमार केली होती. मात्र, एका धाडसी कुळकर्णी महिलेने हाताला लागेल तेवढे सोने अंगावर घालून जवळच्या विहिरीत उडी मारली. ती चाचे जाईपर्यंत तेथेच दडून बसली होती. त्यामुळे ती वाचली. तिच्या अंगावर सोने इतके होते, की त्यातून मिळालेल्या पैशांवर पुढे कुळकर्ण्यांच्या चार पिढ्या जगल्या. परंतु श्रीमंती गेली होती...

देवीहसोळची देवीभेट कातळशिल्पावर

कोकण हा पुरातत्त्व शास्त्रासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर, लांजा आणि देवगड या तालुक्यांच्या पट्टयात जमिनीतून, अचानक वर यावीत तशी कातळशिल्पे-शिल्पचित्रे-खोदचित्रे (Petroglyph) गेल्या काही वर्षांत समोर आली ! रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळपास दोनशेऐंशीपेक्षा जास्त कातळशिल्पे सापडली आहेत. आमच्या कशेळी व राजापूर या भागांत देवाचे गोठणेजवळ ही भव्य कातळशिल्पे सापडली, त्याची ही माहिती…

अमृत्या – आमच्या कशेळीचा फणस

माझे आजोबा म्हणत, ’अमृत्या खाशी, त्याची कीर्ती वीस कोशी’. दरवर्षी त्याला खूप फणस लागतात. हा लाल मातीचा गुण असावा. कशेळी गाव तिन्ही बाजूंनी पसरलेल्या अथांग अरबी समुद्राच्या कुशीत उतरत्या डोंगरात शांत वसलेले आहे. त्या गावात 1661 मध्ये शिवाजी महाराजांचे आगमन झाले होते ! गावात कऱ्हाडे ब्राह्मणांची वस्ती जास्त आहे. आमच्या आगरातील बरक्या फणसाचे वैशिष्टय असे, की त्याचे गरे रसाळ व चवीला अमृतासारखे गोड लागत. म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याला ’अमृत्या’ असे योग्य नाव दिले होते...