महाराष्ट्रात निरनिराळ्या मुख्य जातींना जवळच्या अशा पोटजाती आहेत. त्या मुख्य जातींनी त्यांच्या पोटजातींच्या एकीकरणाच्या चळवळी चालवल्या पाहिजेत. जातिभेदनाशाची पहिली व्यवहार्य व परिणामकारक पायरी म्हणून व पोटजातींच्या सामाजिक गरजा भागवण्यासाठी म्हणून पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता आहे !