तुरुंगातले काव्य

0
60

आचार्य अत्रे यांना अटक 27 जानेवारी 1956 रोजी होऊन त्यांची रवानगी
ऑर्थर रोडच्या तुरुंगात करण्यात आली.
ऑर्थर रोड तुरुंगातल्या वास्तव्याच्या दुस-या दिवशी
नमस्ते श्री महाराष्ट्रा,
भारताच्या जवाहरा,
तीन कोटी मराठयांच्या
मायबापा मनोहरा !

हे काव्य जन्माला आले त्याच वेळेला अत्र्यांच्या मनात विचार आला की या काव्याचा धागा असाच लांबवत ठेवला तर? … तर ‘महाराष्ट्र-गीता’ निर्माण होईल!
अत्र्यांची 18 फेब्रुवारी 1956 रोजी  ऑर्थर रोड  तुरुंगातून ठाण्याच्या तुरुंगात बदली झाली. त्यांना 20 फेब्रुवारी 1956 रोजी ऑर्थर रोड तुरुंगातून ठाण्याला हलवण्यात आले. तर भायखळा ते ठाणे असा रेल्वे प्रवास करत,  ते पोलिसांसह ठाणे स्टेशनवर पोचले, पण ठाणे तुरुंगात नेण्यासाठी कोणीच आले नसल्याने तो गोतावळा वाहनाची वाट बघत बसला.

अत्र्यांची ठाणे तुरुंगात बदली झाली असून ते पोलिस पहा-यात ठाणे स्टेशनवर आले आहेत, हे समजताच लोकांनी तिथे गर्दी केली. त्या गर्दीत कोणीतरी आचार्य नरेंद्र देव यांच्या निधनाची वार्ता अत्र्यांना सांगितली.
आचार्य नरेंद्र देव हे थोर विचारवंत, त्यांचा जन्म पुण्याजवळ देहुरोड नजीकच्या परंदवडी या गावी झाला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर त्यांना गुरुस्थानी मानत असत. आचार्य नरेंद्र देव यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर अत्र्यांना अतिशय दु:ख झाले, पण त्या मनस्थितीत सुध्दा त्यांना ज्या उत्स्फूर्त काव्यपंक्ती सुचल्या त्या वाचून हसू येते. त्या काव्यपंक्ती अशा-

शंकर देवा सोडून देवा,
नरेंद्र देवा का नेले?
आणि सदोबा समोर असता
दृष्टींतून ते कसे सुटले?

About Post Author

Previous articleमी महाराष्ट्राचा – महाराष्ट्र माझा !
Next articleसंरक्षित घर
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.