वाचकांचा अर्थपूर्ण पत्रव्यवहार

0
32

       काही दिवसांपूर्वी ‘लोणार सरोवरात सापडले मंगळावरील जीवाणू’ असे वृत्‍त प्रसिद्ध झाले होते. त्‍याला उत्‍तर म्‍हणून दिनांक 27 एप्रिल 2011 च्‍या लोकसत्‍तेतील वाचकांच्‍या सदरात पुण्‍़याच्‍या सूक्ष्‍मजीव संशोधन केंद्राचे श्रीकांत पवार यांनी एक पत्र लिहीले आहे. त्‍यांनी या पत्रात अत्‍यंत तपशीलवार आणि शास्‍त्रशुद्ध पद्धतीने स्‍पष्‍टीकरण दिले आहे. मंगळावर पाठवण्‍यात आलेले यान अद्याप परतले नाही, असे असताना लोणार सरोवरात सापडलेला जीवाणू मंगळावरील असल्‍याचे सिद्ध होत नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. या पत्रामुळे वाचकांच्‍या पत्रव्‍यवहाराला एकप्रकारचा भारदस्‍तपणा प्राप्‍त झाला आहे. अशाप्रकारच्‍या पत्रांमुळे हे सदर अधिक अर्थपूर्ण होत जाईल.

अशोक जैन
पत्रकार-लेखक

दिनांक – 27/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleमाणसाच्या आयुष्याचा बाजार करणं थांबवा
Next articleवीज वितरणाच्या विरोधाभासात जैतापूर प्रकल्पाचा हट्ट अनाठायी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.