लोकपाल विधेयकाबद्दल नकारात्मक सूर आततायी

0
22

प्रस्तावीत लोकपाल विधेयकाबद्दल सध्या अनेक ठिकाणांहून नकारात्मक सूर ऐकू येत आहे. ही गोष्ट म्हणजे, एखादे मूल जन्माला यावे आणि त्याच्या जन्मामुळे आता अनेक वाईट गोष्टी….

प्रस्तावीत लोकपाल विधेयकाबद्दल सध्या अनेक ठिकाणांहून नकारात्मक सूर ऐकू येत आहे. ही गोष्ट म्हणजे, एखादे मूल जन्माला यावे आणि त्याच्या जन्मामुळे आता अनेक वाईट गोष्टी घडणार आहेत, असे भाकित करण्यासारखे आहे. या विधेयकाला स्वत:चे रूप धारण करण्याचा वेळ दिला जावा असे मला वाटते

मतदान केल्यानंतर पुढील पाच वर्ष मतदाराला सरकारच्या कोणत्याच निर्णयात आवाज नसतो, या केजरीवाल यांच्या मुद्यात तथ्य आहे. सरकारच्या निर्णयात जनतेचा सहभाग असणे गरजेचे आहे आणि त्यामुळे संसदेच्या हक्कांवर गदा येते, असेही समजण्याचे कारण नाही. याकरिता लोकप्रतिनिधी आणि जनतेतील संवाद वाढणे गरजेचे आहे.

गेल्या दोन महिन्यात अरूणा शानबाग आणि अण्णा हजारेंमुळे राष्ट्रीय पातळीवर सर्वसामान्य जनतेत बरीच चर्चा घडली. जनतेने आपली मते मांडणे, विचार व्यक्त करणे यातूनच लोकशाही सुदृढ होत असते आणि या घटना त्यास पूरक ठरल्या.

शरद देशपांडे

पुणे विद्यापिठ,

निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख

{jcomments on}

About Post Author

Previous articleपरस्परांबद्दलचा अविश्वास ही घातक परिस्थिती
Next articleतरूणाईला आवाहन – राहुलप्रणीत की हजारेप्रणीत?
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.