लादेननंतरही दहशतवादाची टांगती तलवार कायम

0
18

    अमेरिकेकडून करण्‍यात आलेल्‍या कारवाईत मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार.


       अमेरिकेकडून करण्‍यात आलेल्‍या कारवाईत मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार झालेला असला तरी जगावरील दहशतवादाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. कारण या कारवाईदरम्‍यान लादेनपेक्षाही धोकादायक असलेला कर्नल गदाफी निसटण्‍यात यशस्‍वी झाला.

       अलकायदापासून जगातल्‍या सर्व लहानमोठ्या दहशतवादी संघटनांना पैसा पुरवण्‍यामागे कर्नल गदाफीचा हात आहे. त्‍याच्‍याकडे एवढी विनाशकारी शस्‍त्रसामग्री आहे, की तो तब्‍बल 14 वेळा पृथ्‍वीची राखरांगोळी करू शकतो. लिबीयाचा गेल्‍या 30 वर्षांचा इतिहास पाहिला तर सर्वात धोकादायक व्‍यक्ति म्‍हणून गदाफीचेच नाव पुढे येते.

       या कारवाईत गदाफीची मुले-नातवंडे बळी पडली आणि तो याचा नक्‍कीच प्रतिशोध घेईल, मात्र जगाला हा लादेनच्‍या मृत्‍यूचा प्रतिशोध आहे, असेच वाटेल. लादेन बुद्धीबळाच्‍या पटलावरचा फक्‍त वजीर होता, खरा राजा गदाफीच आहे. यानंतर गदाफीकडून लवकरात लवकर दहशतवादी कारवाई करण्‍याची शक्‍यता असून तो माद्रीद (स्‍पेन) किंवा इटली (रोम) या ठिकाणी हल्‍ला करू शकतो.

शिरीष देशपांडे

S. N. D. T. विद्यापिठ,

पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख

{jcomments on}

About Post Author

Previous articleबालगंधर्वांच्या जीवनावरील महत्वाकांक्षी मराठी चित्रपट
Next articleअमराठी भारताचा वेध घेऊया
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.