राज्यकर्त्याने सावध असावे!

0
56

आदिनाथ हरवंदे

     “वाहने ठाण्यापासून सायनपर्यंत ठप्प झाली होती; अशा तर्‍हेने मुंबईत वाहतूक ठप्प करण्याची ताकद फक्त ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये आहे!” हे उद्गार आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते छगन भुजबळ ह्यांचे.

राज्यकर्त्यांना सर्वसामान्य माणसाविषयी किती आनास्था वाटते, त्याचे हे द्योतक…

आदिनाथ हरवंदे

     “वाहने ठाण्यापासून सायनपर्यंत ठप्प झाली होती; स्तब्धपणे रांगेत उभी होती. हा मोर्चा फक्त ‘राष्ट्रवादी’चा होता. अशा तर्‍हेने मुंबईत वाहतूक ठप्प करण्याची ताकद फक्त ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये आहे!” हे उद्गार आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते छगन भुजबळ ह्यांचे. राज्यकर्त्यांना सर्वसामान्य माणसाविषयी किती आनास्था वाटते, त्याचे हे द्योतक.

     राजाने रयतेची काळजी वाहायची, त्यांच्या सोईसुविधांकडे लक्ष द्यायचे असे आम्ही बालपणापासून शिकत आलो. पण प्रत्यक्षात सगळे उफराटे दिसते. शक्तिप्रदर्शनाचा हा वेगळा, विपरीत अर्थ!

     ‘राष्ट्रवादी’ची सभा होती त्याच्या अगोदरच्या दिवशी शिवशक्ती+भीमशक्ती आणि भाजप यांनी ‘महामोर्चा’ काढला. त्यांनीही त्या दिवशी वाहतुकीचा खोळंबा केला. जनतेने हा त्रास दोन दिवस सहन केला; भुजबळांना ह्यांचा विषाद वाटायला हवा होता. त्यांनी आनंद प्रकट केला!

     शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी चिपळूणला गेले होते. महाराजांनी प्रजा आणि सैन्य या दोघांची पाहणी केली. लष्कराचे कामकाज तातडीने केले. एक छावणी दळवटणे (चिपळूण) येथे कार्यरत केली. महाराज 9 मे 1674 रोजी रायगडावर परतले. महाराजांच्या मनास नव्या छावणीच्या आसपासच्या जनतेच्या सोयीगैरसोयींचा विचार होता. त्यांनी रायगडावर परतताच दळवटणे छावणीच्या अधिकार्‍यास खलिता लिहिला. त्याचा स्वैर अनुवाद:

     तुम्ही मनास ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल. असेल तोवर मिळेल. पुढचा विचार करून साठवण केली नाहीत तर पावसात उपास पडतील, घोडी मरतील. ती तुम्हीच मारलीत असे होईल. इंग्रजांची मनधरणी करावी लागेल. कुणब्यांकडे गवत, फळे, भाजी, दाणे मागाल. म्हणजे जे कुणबी जीवमात्र येऊन राहिले ते जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरतील. त्यांना वाटेल, आपण मोगल राज्यात आलो! तुमच्याबद्दल तळतळाट होईल. हे बरे जाणोन वर्तणूक करणे. ज्याला जे पाहिजे ते बाजारातून विकत आणावे. कोणावर जुलूम करू नये. तुम्ही निष्ठुर झालेत ऐसे होईल. याकारणे तपशिले लिहिणे, तपशिले ऐकणे आणि हुशार राहणे. ज्याचा गुन्हा होईल, ज्याच्यामुळे बदनामी होईल तो वाचणार नाही!

     स्वत:च्या राज्याभिषेकाच्या तयारीच्या धामधुमीत हे पत्र लिहिणार्‍या राजाच्या मनात रयतेचे कल्याण सतत तेवत होते. वाहतूक ठप्प केल्याचा टेंभा मिरवणार्‍यांनी छत्रपती शिवाजीराजांचे नाव घेताना सावध असावे.

आदिनाथ हरवंदे
संपर्क – 9757104560
email –
adharwande@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleदेशाची श्रीमंती
Next articleनिगमानंदांचे निधन
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.