माध्यमांनी सकारात्मकतेला अधिक वाव द्यावा

0
13

       सिद्धार्थ मुखर्जी यांना पुलित्‍झर पुरस्‍कार मिळणे, ही फार चांगली बाब आहे. भारतामध्‍ये वेगवेगळ्या विषयात तज्ञ असलेल्‍या अनेक व्‍यक्‍ती आहेत आणि त्‍यांनाही अशा त-हेचे सन्‍मान मिळणे गरजेचे आहे. मात्र अशा व्‍यक्‍तींची योग्‍य दखल माध्‍यमांकडून घेतली जात नाही. काही काळापूर्वी पुण्‍़यातल्‍या आयुकामधील एका शास्‍त्रज्ञास ग्रॅव्‍हीटीवर काम केल्‍याबद्दल आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला होता, मात्र भारतातील प्रसिद्धीमाध्‍यमांमध्‍ये त्‍याला प्रसिद्धी मिळाली नाही. जयंत नारळीकरांपासून सिद्धार्थ मुखर्जी यांच्‍या दरम्‍यान भारतात अनेक बुद्धीमान व्‍यक्‍ती होवून गेल्‍या, मात्र त्‍यांची नावे प्रकाशात आलेली दिसत नाहीत. लहानपणी मला साहित्‍यीक व्‍हावेसे वाटायचे, कारण त्‍या वेळी साहित्‍यीकांना माध्‍यमांमध्‍ये बरीच प्रसिद्धी मिळायची. जर मी आज जन्‍माला आलो असतो, तर मला गुंड व्‍हावेसे वाटले असते. नेहमीच गुन्‍हेगारीच्‍या आणि नकारात्‍मकतेच्‍या बातम्‍या देण्‍यापेक्षा माध्‍यमांकडून यांसारख्‍या सकारात्‍मकतेलाही वाव देणे गरजेचे आहे.

शिरीष देशपांडे
S. N. D. T. विद्यापिठ,
पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख.

दिनांक – 20/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleसरकारने नखं बाहेर काढली
Next articleआता अण्णा काय करणार?
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.