मराठी साहित्यांत गुप्त्हेरकथांचा ओघ आटलेला

0
28

feludaदिनांक 22 एप्रिल 2011 च्‍या लोकसत्‍तेतील ‘व्‍यक्‍तीवेध’ या सदरात ‘इजहार अशर’ या उर्दूतील गुप्‍तहेर कथालेखकाची अतिशय रोचक माहिती देण्‍यात आली आहे. त्‍यांचे अलिकडेच निधन झाले. अशर यांनी 1000 पेक्षा जास्‍त कादंब-या लिहील्‍या होत्‍या. यावरून उर्दू वाड्ःमयात गुप्‍तहेर कथांचा केवढा मोठा भाग आहे, हे समजते. आपल्‍याकडे बाबूराव अर्नाळकरांनंतर गुप्‍तहेरकथांचा हा ओघ आटल्‍यासारखा भासतो. प्रसिद्ध बंगाली सिनेदिग्‍दर्शक सत्‍यजित रे यांच्‍या फेलुदा या गुप्‍तेहर पात्राच्‍या काही कथांचा अनुवाद मराठीत नुकताच प्रसिद्ध झाला. मात्र एकूण्‍च मराठीत हा गुप्‍तहेर कथांचा फॉर्म मागे का पडला, यावर विचार होणे गरजेचे आहे.

दुसरीकडे अण्‍णांचे कवित्‍व सुरूच आहे. शांतीभूषण आणि त्‍याचे पुत्र प्रशांतभूषण यांची आणि माझी काहीच ओळख नव्‍हती, तसेच त्‍यांची निवडही माझी नव्‍हती, तर दिल्‍लीतील एका व्‍यक्‍तीने त्‍यांचे नाव सुचवल्‍यामुळेच लोकपाल विधेयकाच्‍या समितीसाठी त्‍यांचे नाव पुढे करण्‍यात आले होते, असे अण्‍णा म्‍हणाले. हे कमालीच्‍या गलथानपणाचे उदाहरण आहे. एवढ्या संवेदनशिल बाबीबद्दल अण्‍णांनी जागरूक रहाणे गरजेचे होते. त्‍यामुळे आज लोकपाल विधेयक बाजूला राहून इतर गोष्‍टींवर चर्चा घडत आहेत. त्‍यामुळे अण्‍णांनी या समितीसाठी सूचवलेले संतोष हेगडे यांच्‍या नावावरही शंका उपस्थित केली जाईल.

अशोक जैन
पत्रकार-लेखक

दिनांक – 22/04/2011

About Post Author

Previous articleखाणकामगारांची चिंता शासनाला, ना खाणमालकांना!
Next articleसगळ्या मराठी शाळा आठवीपर्यंत का नाहीत?
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.