मराठी शाळा टिकवायच्या कशा?

0
26

     मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा गरम होईल का? तर ते कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. जनतेचा या प्रश्नाशी काही संबंध आहे असे वाटत नाही. शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित मराठी शाळा सर्वत्र बंद पडत आहे.

–  दिनकर गांगल

     मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा गरम होईल का? तर ते कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. जनतेचा या प्रश्नाशी काही संबंध आहे असे वाटत नाही. शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित मराठी शाळा सर्वत्र बंद पडत आहे. सरकारकडे नव्या शाळा जुनपासून सुरू करण्यासाठी अर्ज आले आहेत ते मुख्यत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी. मराठी शाळांबाबत मराठीप्रेमी कार्यकर्ते वातावरण तापवत ठेवत असल्याने सरकारला इंग्रजी माध्यमाच्या शाळा राज्यात सुरू करण्यास परवानगी देणे अवघड झाले असताना हा प्रश्न भावनेने नव्हे, बुध्दीने सोडवावा लागेल. मराठी माध्यमात मराठी भाषिकांचा जीव गुंतला आहे. त्या ऐवजी व्यवहारत: मराठी शाळा चालवायच्या कशा या प्रश्नाचे कार्यकर्त्यांनी उत्तर द्यावे.

     मराठी भाषा राज्यभाषा म्हणून टिकवणे जवळजवळ अवघड आहे. उलट, खाजगी रीत्या मराठी भाषेचे संवर्धन व जोपासना करणे शक्य आहे. त्यासाठी मराठी प्रेमी जनतेला दुरदृष्टी दाखवावी लागेल व त्याग करावा लागेल.

दिनकर गांगल
ज्‍येष्‍ठ पत्रकार

दिनांक – 25.05.2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleउद्याची नवी भाषा दृकश्राव्य असेल का?
Next articleहे तर सरकारचे विकृत धोरण!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.