मरणोत्तर निःशुल्क सेवा!

0
31

–  ज्‍योती शेट्ये

   वाढत्‍या महागाईने सर्वसामान्‍य जनतेचे जगणे नकोसे केले आहे. सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्‍यात कमी पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकत्‍याच घडलेल्‍या दोन घटनांमधील विरोधाभास  ज्‍योती शेट्ये यांनी मांडला आहे. रूग्‍णावर उपचार करण्‍यासाठी डॉक्‍टरने वेळेवर पोहचू नये, मात्र त्‍याच्‍या अंत्‍ययात्रेला मूठमाती देण्‍यास न चुकता यावे, अशी सध्‍या सरकारची वर्तणूक असल्‍याचे दिसते.


–  ज्‍योती शेट्ये

     10 ऑगस्‍ट 2011 (लोकसत्‍ता) – डोंबिवलीच्‍या महापौर वैजयंती गुजर यांच्‍या पुढाकाराने येथील स्‍मशानभूमीत एल. पी. जी. वर चालणारी विद्युतदाहिनी सुरू करण्‍यात आली आहे. या दाहिनीत प्रत्‍येक मृत व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍यविधीसाठी पालिकेकडून सुमारे 1,750 रूपये खर्च केले जातात. या शवदाहिनीतील सेवा पालिकेकडून विनाशुल्‍क उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. ही सेवा विनाशुल्‍क असल्‍याने नागरिकांकडून ती पसंत केली जात असल्‍याचे उपअभियंत्‍यांकडून सांगण्‍यात आले.

     12 ऑगस्‍ट 2011 (लोकसत्‍ता) – वाढत्‍या महागाईला कंटाळून ठाणे येथील भीमराव भंडारे या साठ वर्षांच्‍या गृहस्‍थाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. गळफास घेण्‍यापूर्वी त्‍यांनी लिहीलेल्‍या चिठ्ठीत ‘आपण महागाईला कंटाळून आत्‍महत्‍या करत आहोत. याला सरकार जबाबदार आहे’ असे म्‍हटले आहे.

     दिवसेंदिवस जगणे महाग होत असतानाच ‘सरकारच्‍या कृपेने’ मरणोत्‍तर निःशुल्‍क सेवा उपलब्‍ध झाली आहे. महागाईला आळा घालून जनतेचे जीतेपणीचे खर्च कमी करण्‍यात सरकार अपयशी ठरत असले, तरी सर्वसामान्‍यांच्‍या मरणानंतरचे खर्च कमी करण्‍याचा ‘स्‍तुत्‍य’ प्रयत्‍न सरकारने सुरू केला आहे. सरकारने डोंबिवलीप्रमाणे ही सेवा सर्वत्र उपलब्‍ध करून द्यावी.

ज्‍योती शेट्ये, मोबाईल – 9830737301, ईमेल – jyotishalaka@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleसंसदीय पद्धतीत बदल हवा
Next articleराष्ट्रगीताबद्दल अपप्रचार चुकीचा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.