नैतिक दबावाची गरज

0
65

संदीप बर्वे

     शिरूरच्‍या अहमदाबाद – हैद्राबाद मार्गावरून रिलायन्‍सची गॅस पाईपलाईन गेली आहे. येथील शेतक-यांना त्‍यांच्‍या जमिनीचा रिलायन्‍सकडून कमी मोबदला देण्‍यात आलेला असून या प्रकरणी आम्‍ही लढा देत आहोत. हा मोबादला इतका विषम आहे, की आकड्यांमधील फरकच थक्‍क करून टाकतो. शेतक-यांच्‍या हातावर प्रति गुंठा केवळ 3000 रूपये टेकवण्‍यात आले आहेत, मात्र या बदल्‍यात रिलायन्‍सला हजार कोटींचा फायदा होणार आहे. भांडवलशाही वगैरे गोष्‍टी आतापर्यंत अमूर्त स्‍वरूपात अनुभवत होतो, शिरूरच्‍या प्रश्‍नाच्‍या निमित्‍ताने ते प्रत्‍यक्ष पाहतही आहे. अंबानी एवढा मोठा कसा झाला याचं हे प्रतिनिधीक उदाहरण वाटते.


संदीप बर्वे

     शिरूरच्‍या अहमदाबाद – हैद्राबाद मार्गावरून रिलायन्‍सची गॅस पाईपलाईन गेली आहे. येथील शेतक-यांना त्‍यांच्‍या जमिनीचा रिलायन्‍सकडून कमी मोबदला देण्‍यात आलेला असून या प्रकरणी आम्‍ही लढा देत आहोत. हा मोबादला इतका विषम आहे, की आकड्यांमधील फरकच थक्‍क करून टाकतो. शेतक-यांच्‍या हातावर प्रति गुंठा केवळ 3000 रूपये टेकवण्‍यात आले आहेत, मात्र या बदल्‍यात रिलायन्‍सला हजार कोटींचा फायदा होणार आहे. भांडवलशाही वगैरे गोष्‍टी आतापर्यंत अमूर्त स्‍वरूपात अनुभवत होतो, शिरूरच्‍या प्रश्‍नाच्‍या निमित्‍ताने ते प्रत्‍यक्ष पाहतही आहे. अंबानी एवढा मोठा कसा झाला याचं हे प्रतिनिधीक उदाहरण वाटते.

     या शेतक-यांना न्‍याय मिळवून देण्‍याचा प्रयत्‍न करत असताना अनेक सरकारी अधिका-यांशी संपर्क येतो. हे तहसिलदार किंवा जिल्‍हाधिकारी मोठ्या कसोट्या पार पाडून त्‍या जागेवर बसलेले असतात. तिथे आल्‍यानंतर ते मुर्दाड होतात. त्‍या व्‍यवस्‍थेमध्‍ये आल्‍यानंतर त्‍यांना पांघरावा लागणारा तो सरकारीपणाचा किंवा नोकरशहीचा मुखवटा पाहिला की माणूस म्‍हणून त्‍यांची सहानुभूती वाटते. बरीच मंडळी मदत करतात, मात्र त्‍याचे पुढचे फॉलोअप घेताना त्‍यांची अकार्यक्षमता आणि दबावाशिवाय काम न करण्‍याचा मुर्दाडपणा प्रत्‍ययाला येतो. केवळ या एकाच गोष्‍टीसाठी नव्‍हे तर सर्वच गोष्‍टी घडवण्‍यासाठी शासनावर सातत्‍यपूर्वक नैतिक दबाव टाकणारी एखादी व्‍यवस्‍था हवी, असे वारंवार वाटते.

– संदीप बर्वे
-कार्यकर्ता, युक्रांद.
-9860387827

दिनांक – 22/06/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleधुआँ उडाताही चला……….
Next articleलक्ष लक्ष प्रकाशफुले!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.