दूरदर्शनवर मराठी भाषेची ऐशीतैशी

0
26

     लोकसत्तेत अलिकडे वाचकांच्या पत्र व्यवहाराला प्रमुख स्थान देण्यात आलेले आहे. दिनांक 7 एप्रिल 2011 च्या वाचकांच्या पत्रव्यवहारात सावंतवाडीमधील सप्रे नावाच्या व्यक्‍तीचे पत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. ते दूरदर्शनवरील मराठी भाषेसंबंधी काही निरीक्षणे नोंदवतात. एका नायिकेच्या तोंडी असे संवाद होते, की “मी तिथे गेली होती” पण प्रत्यक्षात हे वाक्य “मी तिथे गेले होते” असे असायला हवे होते. या प्रकारची काही उदाहरणे तिथे नमूद करण्यात आली आहेत.

     लोकसत्तेत अलिकडे वाचकांच्या पत्र व्यवहाराला प्रमुख स्थान देण्यात आलेले आहे. दिनांक 7 एप्रिल 2011 च्या वाचकांच्या पत्रव्यवहारात सावंतवाडीमधील सप्रे नावाच्या व्यक्‍तीचे पत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. ते दूरदर्शनवरील मराठी भाषेसंबंधी काही निरीक्षणे नोंदवतात. एका नायिकेच्या तोंडी असे संवाद होते, की “मी तिथे गेली होती” पण प्रत्यक्षात हे वाक्य “मी तिथे गेले होते” असे असायला हवे होते. या प्रकारची काही उदाहरणे तिथे नमूद करण्यात आली आहेत.

     दिल्लीतील ‘स्टेटसमन’ या प्रसिध्द वृत्तपत्रात संसदेच्या कामकाजावर आधारित ‘अ व्ह्यू फ्रॉम प्रेस गॅलरी’ नावाचे सदर लिहीले जाते. यात सभागृहातील वातावरणाचा धांदोळा घेतला जातो. लोकसत्तेत याच पद्धतीने ‘शून्य प्रहर’ हे सदर लिहीले जाते. ही फार वेगळी कल्पना असून ती अधिक कसोशीने राबवणे आवश्यक आहे. लोकसत्‍तेतील या सदरात विधानसभेत मांडण्यात आलेल्या एका ठरावाची माहिती देण्यात आली असली तरी सभागृहाच्या वातावरणातविषयी काहीच लिहीण्यात आलेले नाही. हे सदर अधिक रोमहर्षक करण्यासाठी सभागृहाचे वातावरण जिवंतपणे साकारणे गरजेचे आहे.

– अशोक जैन
पत्रकार – लेखक

{jcomments on}

About Post Author

Previous articleसंपादकीय 2
Next articleकायदा करण्‍याचा अधिकार कुणाला
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.