जैतापूर हिंसेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची?

0
17

जैतापूर आंदोलनात शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी उतरण्‍याचा निर्णय घेतल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या घटनेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची? आधी हात उगारतो कोण आणि हिंसक होण्यास प्रवृत्त करतो कोण, याचाही याबाबतीत विचार व्हायला हवा

अण्णा हजारे यांनी उपोषणाद्वारे लोकपाल विधेयकाचा मुद्दा जनतेच्‍या नजरेत आणला. आता जनतेचे लक्ष या विधेयकाच्या मुद्द्यावरून विचलित व्हावे, यासाठी राजकारण्यांकडून बनावट सी.डी. वगैरे प्रकरणांना महत्त्व दिले जात आहे. त्यांचे हेतू उघड असून या विधेयकाच्या मार्गात जास्तीत जास्त अडथळे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सरकारने पाण्याचा प्राधान्यक्रम बदलला. आता उद्योगधंद्यांना पाणी पुरवल्यानंतर उर्वरीत पाणी शेतीला दिले जाणार. देशाला जशी वीजेची गरज आहे, तशीच अन्नधान्याने देशाला समृध्द करण्याचीही गरज आहे. आजही असंख्य लोकांचे रोजगार शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्राधान्यक्रमात शेतीला महत्त्व देणे गरजेचे आहे.

–  विजया चौहान

शिक्षण हक्क समन्वय समिती आणि मराठी अभ्यास केंद्र.

दिनांक – 19/04/2011

About Post Author

Previous articleसत्याग्रही आणि मिडीया एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत का?
Next articleजैतापूर की चिखलापूर ?
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.