थट्टा अंगाशी आली..

0
61

थट्टा अंगाशी आली…
नव्हे…डोक्यावर बसली !


आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले आद्य विडंबनकार! ‘झेंडूची फुले’ हा त्यांच्या विडंबन काव्यांचा संग्रह सर्वपरिचित आहे.
अत्र्यांच्या विडंबनाचा फटका ब-याच लोकांना बसला. त्यातून मैत्रीच्या संबंधात काहींशी वितुष्ट आले, पण ते फार काळ टिकले नाही. या विडंबनाचा फटका समर्थ रामदासांनाही बसला. अत्र्यांनी मनाच्या श्लोकांचे विडंबन केले. त्यातला एक श्लोक प्रसिध्द आहे.

मनासज्जना,चार आण्यांत फक्त।
तुला व्हावयाचे असे देशभक्त ॥
परि सांगतो शेवटी युक्ति सोपी ।  
खिशामाजी ठेवी सदा गांधी टोपी ॥   

अत्र्यांनी जेव्हा या काव्यपंक्ती लिहिल्या तेव्हा गांधी टोपीचा प्रसार सर्वत्र झाला होता. ते देशभक्तीचे प्रतीक ठरले होते. गांधीटोपीची किंमत चार आणे होती.

हे विडंबन प्रसिध्द झाल्यानंतर काही वर्षांनी, अत्र्यांना जेव्हा पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांना सर्व प्रथम चार आणे खर्च करून गांधीटोपी विकत घ्यावी लागली. आणि त्यांच्याच विडंबित श्लोकाप्रमाणे कृती करावी लागली.

About Post Author

Previous articleलेखसूची..
Next articleपराभवानंतरच्या चाली-हालचाली
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.