सौंदर्य रत्नदुर्गाचे
09/07/2014
रत्नागिरी हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, सावरकर स्मारक, ऐतिहासिक पतितपावन मंदिर, विठ्ठल मंदिर, भाट्येचा समुद्र किनारा, नारळ संशोधन केंद्र, मत्स्यालय, मांडवी जेट्टी यांसह इतर काही ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांची वर्दळ रत्नागिरीला वर्षभर सुरू असते.