पश्चिमी क्षत्रपांची नाणी! – पुस्तकाची कहाणी
‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकाच्या निर्मितीतील मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचा प्रवास हा एखाद्या फिरस्तीपेक्षा कमी नव्हता! तीनशेपन्नास वर्षांतील क्षत्रपांच्या राज्याचा तो प्रवास करणे फार रंजक होते, त्यांनी माळवा-गुजरात पासून जरी राज्यास सुरुवात केली असली तरी त्यांनी त्यांची सत्ता महाराष्ट्रातही वाढवली. त्यांच्या त्या इतिहासाचे पुरावे शोधून संकलित करणे हे फार स्फूर्तिदायक होते. त्या प्रवासात क्षत्रपांचे विविध पैलू नजरेस पडले. क्षत्रप हे आगंतुक होते, बाहेरदेशांतून भारतात आलेले होते. त्यांनी त्यांची सत्ता जवळ जवळ तीनशेपन्नास वर्षें सलग गाजवली आणि त्यांच्यासमोर सातवाहनांसारखा बलाढ्य शत्रू होता. तो इतिहास अभ्यासताना सर्वात जास्त मदतगार ठरली ती क्षत्रपांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची नाणी. त्याच नाण्यांचे महत्त्व सांगणारे छोटेखानी पुस्तक आहे ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’.