‘उत्सव कलाम’ - निबंधस्पर्धा
माजी राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 15 ऑक्टोबर या दिवशी असते. त्या दिवशी शाळांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. आम्ही सात मित्रमैत्रिणी मिळून ‘बाराखडी’ नामक एक समूह कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरू केला आहे. मी, ज्योती जगताप, उज्ज्वला पवार, विकास ठाकरे, परमेश्वर घोडके, धनश्री मराठे, संकेत गावडे असे सातजण समुहात आहोत. ज्योतीने कल्पना सुचवली, की कलाम यांची जयंती आहे. त्यांचा ‘इस्रो’शी संबंध आला आहे, ते शास्त्रज्ञ होते. त्यांनी महत्त्वाचे शोधही लावले आहेत. ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान-2’ या मोहिमेची गाथाही गावोगावी पोचली आहे. त्या साऱ्या आठवणींना उजाळा म्हणून निबंध स्पर्धा घ्यावी. स्पर्धा घ्यावी हे आम्ही ‘बाराखडी’ गटाला पटलेच, पण वर्ष ‘उत्सव कलाम 2019-20’ म्हणून साजरे करावे असेही ठरले. आम्ही तलासरी तालुक्यातील निवडक जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. त्यांना स्पर्धेविषयी माहिती सांगितली. स्पर्धा माध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांची घेतली.