Tag: साखर
साखरवाडी – खो खो ची पंढरी
जसा लौकिक कुस्तीसाठी हरियाणाने, टेनिससाठी आंध्र प्रदेशने आणि फुटबॉलसाठी ईशान्य भारताने कमावला आहे, तसाच लौकिक महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी नावाच्या गावाने खो-खो च्या राष्ट्रीय मैदानावर मिळवला आहे ! साखरवाडीच्या विशेषतः मुलींचा धसका देशभरच्या खो-खो खेळाडूंनी घेतला आहे. साखरवाडीच्या मुलींच्या मैदानावरील चपळाईने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरते आणि पाहणारे थक्क होऊन जातात ! त्या गावातून शंभराहून जास्त राष्ट्रीय खो खो खेळाडू घडले आहेत...
ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...
खोंगा खोंगा साखर
आई-मुलीचे शब्दांची गरज न भासता, एकमेकींना समजण्याचे अनुभव तसे वैश्विकच. वत्सलाबाई बापुराव भोंग यांनी आईबद्दलच्या आठवणी गप्पांतून सांगितल्या आहेत. सोप्या शब्दांतून, प्रामाणिक संवादातून त्यांच्या नात्यांमधले उमाळे, कढ, आपुलकी आणि स्नेह व्यक्त होतोय. नात्यातला ओलावा टिकवून धरणाऱ्या गोष्टींची अनुकरणीय जाणीव हा लेख वाचणाऱ्या सगळ्यांना झाल्यावाचून राहणार नाही...
भारताच्या अर्थव्यवस्थेला इथेनॉल निर्मितीमुळे आधार
ऊस लागवडीचे देशातील वीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. ऊसाची मळी आंबवून त्यातील साखरेचे मद्यार्कात रूपांतर करतात. त्यांपासून अल्कोहोल, डिनेचर्ड स्पिरिट, इथेनॉल यांची निर्मिती होते. इथेनॉल पेट्रोल-डिझेलसारख्या इंधना बरोबर वाहनांसाठी वापरता येते...
ऊस शेती – किमया तीन ‘एफ’ची
भविष्यकाळात देशाच्या प्रगतीसाठी ऊसशेती हा एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ऊसशेती करण्याचे फायदे शेतकऱ्यांनी जाणून घ्यायला हवेत...