Tag: अमेरिका
उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का?
‘उपनयन’ संस्काराची सुरुवात कुटुंबातील बालकाचा ‘विधिपूर्वक शिक्षण-प्रवेश’ व्हावा या हेतूने झाली असावी. ती प्रथा कायमस्वरूपी व शिष्टसंमत होण्यासाठी ती ‘धर्मसंस्कार’ म्हणून स्वीकारली गेली. पण तो विधी सध्याच्या काळात गरजेचा आहे का? तेव्हाची आणि आजची जीवनपद्धत-शिक्षणपद्धत यांत बदल झाला आहे. त्यामुळे मुंज कालसापेक्ष राहिलेली नाही असे मत अशोक विद्वांस यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणांद्वारे त्यांच्या उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का? या लेखात स्पष्ट केले आहे. त्याच लेखात स्त्रीवर्ग अशा धार्मिक समजल्या जाणाऱ्या विधींकडे कसे पाहतो तेही स्पष्ट होत जाते...
अमेरिका – स्थलांतरितांचा देश (America, The Migration Story)
पृथ्वीतलावरील अनेक देशांतील लोक 1840 सालापासून अमेरिकेच्या भूमीवर येऊन थडकत आहेत. कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यात सोने सापडल्याची बातमी 1848 च्या सुमारास जगभर पसरली. त्यामुळे सोन्याच्या मोहाने त्यावेळी तीन लाखांपेक्षा जास्त लोक अमेरिकेत येऊन ठेपले. त्या विषयी एक सिनेमाही विसाव्या शतकाच्या मध्यावर निघाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अनेकांना त्यांचे त्यांचे देश सोडून पळावे लागले होते. अनेक देशांतील प्रतिभावान आणि मेहेनती तरुण त्या काळात अमेरिकेत दाखल झाल्याने अमेरिका श्रीमंत होण्यास मदत झाली ! किंबहुना तेव्हापासूनच अमेरिकेची धारणा अशी बनत गेली, की जगातील हुशार लोकांनी अमेरिकेत यावे ! आणि त्यांच्या बुद्धिप्रतिभेला व कार्यशक्तीला तेथे वाव होताही...
माझी पुंजी : मला भेटलेली माणसे !
पद्मिनी दिवेकर शिकागोच्या नेपरव्हिल नावाच्या उपनगरात गेली सत्तावीस वर्षे राहत आहे. त्या नवरा सतीश आणि मुलगी गार्गी भारतातून अमेरिकेला गेले. त्या भारतात ‘कोशीश स्कूल फॉर द डेफ’ ह्या मालाड येथील बहिऱ्या मुलांच्या शाळेत शिक्षिका 1987 ते 1993 पर्यंत होत्या. त्या अमेरिकेत गेल्यानंतर तेथील प्रिस्कूलमध्ये आणि नंतर हायस्कूलमध्ये टीचिंग असिस्टंट म्हणून नोकरी काही वर्षे करू लागल्या. त्यांना पुन्हा स्पेशल एज्युकेशन शिक्षिका व्हावेसे वाटत होते. त्यांनी अमेरिकेत स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या विषयातील असिस्टंट म्हणून इलिनॉईस राज्याच्या अर्ली इंटरव्हेन्शन अंतर्गत काम करतात. त्यांच्या घरापासून पंचवीस मैलांच्या परिघात शून्य ते तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांना घरी जाऊन स्पीच थेरपी देतात. त्या हे काम पंधरासोळा वर्षे करत आहे...
कॅलिफोर्नियाची उपमा कोकणास का? (Can Kokan area in Maharashtra take clue from California?)
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोने पावणेदोनशे वर्षांपूर्वी सापडले. कोणीही जावे आणि सोन्याचे पोते घेऊन यावे असा समज सर्वत्र पसरला. सोने मिळते म्हटल्यावर जो तो सोने हाती लागेल या आशेने कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी धावत सुटला. अमेरिकेतील माणसे आली, चीनमधून बोटी भरून आल्या. त्याला ‘गोल्ड रश’ असे म्हणतात. ‘मॅकेनाज गोल्ड’ नावाचा सिनेमा त्या हकिगतीतूनच निर्माण झाला होता. तेथील स्टॅनफर्ड विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची नावे बघितली तर त्या शिक्षणसंस्थेची थोरवी मनात अधिकच ठसून जाते...
बुद्धीसवे भावना ! (Emotional quotient is necessary part of logical thinking)
सद्भाव मनात असणे ही सहज प्रक्रिया आहे. तो शोधण्यासाठी काहीतरी अद्वितीय करण्याची किंवा त्याचा पाठलाग करण्याची आवश्यकता मुळीच नसते. अवतीभवती घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांतूनदेखील व्यक्तीवर सद्भावनेचा सखोल परिणाम होत असतो. प्रवासात भेटणारी माणसे, प्राणी-पक्षी-वनस्पती यांना समजून घेण्यासाठी किंवा प्रसंग सहृदयतेने टिपण्यासाठी हवे संवेदनशील मन. त्या मनाला समानानुभूतीने विचार करण्याची क्षमता हवी, जागरूकता हवी आणि समजून घेण्याची कुवतही हवी. तसे संवेदनक्षम मन आणि घटना व व्यवहार यांच्याकडे बघण्याची सजगता असेल, तर कितीतरी गोष्टी शिकवल्या जातात असे सांगणारा स्वप्रचीतीने प्रकट झालेला नीलिमा खरे यांचा हा लेख...
स्थलांतरित आणि निर्वासित (The difference between immigrants and Refugees)
मानववंश आफ्रिकेत लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला. मानवी समूह तेथे घडून तेथून जगभरातील अनेक भूखंडांत स्थलांतरित झाले. त्या समूहांनी तेथे तेथे रहिवास करून त्या त्या ठिकाणाला त्यांची जन्मभूमी मानले. त्यातूनच पुढे, अनेक वेगवेगळ्या भूभागांमध्ये संस्कृती विकसित होत गेल्या आणि तेथे यथाकाल देशांची निर्मिती झाली- देशांच्या सीमा ठरल्या गेल्या. तो विकास समूह व्यवस्था(पन), ग्राम व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि राष्ट्र व्यवस्था असा सांगितला जातो. त्यातूनच एकेकट्या कुटुंबांची प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील अधिसत्ता निर्माण झाल्या. ती राजेशीही होय. राजेशाहीचा अस्त जगातील बहुतांश देशांत एकोणिसाव्या व विसाव्या शतकात होऊन लोकशाही सत्ताप्रणाली जगभर प्रस्थापित झाली...
भाषादूत मॅक्सिन बर्नसन
मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...
‘नाटो’ बरखास्त करणे हाच उपाय
नाटो म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ या संघटनेची स्थापना 1949 साली झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या या संघटनेचा मुख्य उद्देश हा सोव्हिएत युनियनच्या वाढत्या व्याप्तीला मर्यादा घालणे हा होता. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा शेवट झाल्यामुळे ‘वॉर्सा पॅक्ट’ नष्ट झाला. तर मग आता ‘नाटो’ ची गरज काय?...
अवलिया कलावंत- वसीमबारी मणेर
फलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे ! कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. तो चित्रपट दिग्दर्शक-निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, शिक्षक, प्रकाशक, बालसाहित्यिक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो...
कृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर
बनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती...