Home Search

हळद - search results

If you're not happy with the results, please do another search

शेवगाव पक्षी निरीक्षणातील कॅमेऱ्यात मगरीचे शेपूट

पैठणचे जायकवाडी धरण शेवगावपासून (नगर जिल्हा) अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथे हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती शेवगावापासून हाकेच्या अंतरावर तयार झाली आहे. तिचा लाभ सभोवतालच्या खेड्या-शहरांतील लोक आनंदाने घेत असतात. खरे तर, नाथसागर जलाशयाचा सर्व भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे...

विधवा सन्मान ही मलमपट्टी !

0
महिलेला पतीच्या निधनानंतर भेडसावणारी खरी समस्या आर्थिक बाबतीतील असते. तिला अलंकार घालण्याची मुभा देणे ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. एखाद्या सरकारी परिपत्रकामुळे तिच्यावरील अन्यायाची चौकट खिळखिळी होणार नाही. विधवांना आर्थिक स्थैर्य व त्यांचे सांपत्तीक हक्क मिळवून देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष संवाद, प्रसारमाध्यमे, वैयक्तिक वागणुकीची उदाहरणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी समाज परिवर्तनाचे प्रयत्न करावे लागतील...

हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले! (Herwad Village is charged with reforms for better treatment...

समाजाच्या चौकटी मोडणे सहजशक्य नसते परंतु संपूर्ण गाव एकत्र आले तर काय करू शकते, याचा आदर्श हेरवाडच्या ग्रामस्थांनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव संमत करून घालून दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे. ‘गाव करेल ते राव काय करील’ ही उक्ती हेरवाडकरांनी सार्थ ठरवली आहे...

दंडारण – आंध जमातीचे लोकधर्मी नाट्य

‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...

केळशीच्या रमलखुणा

पूर्वीच्या काळी गाव, गावाकडची संस्कृती, गावची अर्थव्यवस्था कशी होती याचे प्रातिनिधिक रूप म्हणजे केळशी. गावाकडचे निसर्गसौंदर्य, तेथील लोकजीवन आणि त्यातील वेगळेपण हे सगळेच भूरळ घालणारे होते. आज गावे शहरीकरणामुळे सुधारली. पूर्वीच्या गावांबाबत अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला जुन्या गावची सैर केळशी या गावातून घडेल...

केळशी गावचे पारंपरिक खाद्यपदार्थ

महाराष्ट्रात प्रत्येक पट्ट्याची खास खाद्यसंस्कृती आहे. त्यात प्रामुख्याने कोकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खान्देशी, वऱ्हाडी या म्हणता येतील. कोकणात नारळ व तांदूळ मुबलक उपलब्ध असल्यामुळे तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांत खोबरे व तांदूळ यांपासून बनवलेले पदार्थ जास्त आढळतात...

आमचा रोड

एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे...

पुरोगामी विचारांचा वारसा – सासकल

फलटण तालुक्यातील सासकल हे एक छोटेसे गाव. त्या गावातील ग्रामस्थ ग्रामविकासाबाबत सजग आहेत. पारंपरिक धर्मभावनेला आधुनिक विचारांची जोड देणाऱ्या सासकल या गावाने त्याचा ठसा क्रीडा क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे...

रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र

हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...

फुलपाखरांच्या गावात…

श्रीकृष्णांचे गुरू सांदिपनी यांचा आश्रम पालघर जिल्ह्यातील चांदिप गावात होता असे म्हटले जाते. सांदिपनी ऋषींचे गुरुकुल मध्यप्रदेशात आहे. महाराष्ट्रातील चांदिप हे ठिकाण मात्र ‘नाही...