Home Search

हळद - search results

If you're not happy with the results, please do another search

आनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास ! (Appropriate Technology Man – Anand Karve)

आनंद दिनकर कर्वे हे भारतीय बहुआयामी संशोधक आहेत. त्यांनी आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे ‘ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी’ या विषयावर काम केले. ते पुण्यातील ‘अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ (आरती) या संस्थेचे प्रवर्तक. त्या संस्थेला ब्रिटनमधून ‘ग्रीन ऑस्कर’ समजला जाणारा ‘अॅश्डेन पुरस्कार’ 2002 आणि 2006 साली, असा दोन वेळा मिळाला आहे. तो पुरस्कार चिरंतन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील नावीन्यपूर्ण व लोकोपयोगी प्रकल्पांना दिला जातो...

परतवाडा येथील श्री शारदा महिला मंडळ

श्री शारदा मंडळाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मंडळ माई करकरे आणि त्यांच्या खास जिवलग व जिद्दीने काम करणाऱ्या मैत्रिणी मामी गोरे, बाई नवरे, काकू पराडकर, नमू अभ्यंकर व प्रमिला मुजुमदार- यांच्या प्रयत्नाने व एकीमुळे पुढे आले. त्यांनी शारदेची स्थापना करून कार्यक्रम केले. अचलपूरमध्ये खाजगी मराठी प्राथमिक शाळा नव्हती, म्हणून बालक मंदिर ही शाळा सुरू केली. ती अजूनही चालू आहे...

दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे (Dapoli’s four hundred years old Mandalik family)

दापोलीच्या मंडलीक घराण्याच्या इतिहासात पंधराव्या शतकापर्यंत मागे जाता येते. गंगाधरभट यांनी मुरुड हे गाव वसवले. मंडलीक घराण्याचा ठळक गुणविशेष म्हणून विस्थापितांचे पुनर्वसन, नवीन प्रदेशात वस्ती करून नवे विचार रूजवणे असा सांगता येईल. त्यांनी मुरुड गाव वसवताना मुसलमान बंधूंसाठी मशीद बांधली ! त्यावरून त्यांची सर्वधर्मसमभावाची दृष्टी लक्षात येते. मंडलीक घराण्यातील रावसाहेब, डॉ. पी.व्ही. व डॉ. जी.व्ही. यांचे योगदान महत्त्वाचे आहे...

कोकणी घराचा नमुना देगावला (Typical layout of a Konkan house at Degaon)

0
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील देगाव गावात 1941 रोजी बांधलेली एक आगळी वास्तू आहे. तीन बाजूंना पऱ्ह्याचे जणू नैसर्गिक कुंपण आणि समोरच्या बाजूला लालचुटुक मातीचा रस्ता… ते गावाच्या मधोमध वसलेले कौलारू घर आहे इंदिराबाई विद्याधर गोंधळेकर यांचे. सध्या तेथे त्यांचा मुलगा अशोक गोंधळेकर एकटे राहतात. ते व्यवसायाने इंजिनीयर आहेत. ते त्यांच्या मुंबईतील व्यवसायातून निवृत्त झाल्यावर वास्तू व बाग सांभाळण्यास गावी परतले...

पिंपळवाडीची झाली साखरवाडी – सारे गोड गोड ! (Sakharwadi – Village transformed by private...

साखरवाडी हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील गाव. महाराष्ट्रातील पहिला आपटे यांच्या मालकीचा खासगी साखर कारखाना म्हणून साखरवाडीच्या कारखान्याची नोंद आहे. गावाची क्रीडाक्षेत्रामधील कामगिरी उल्लेखनीय आहे. हे गाव खो-खो या खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या गावातील खो खो संघाचा दबदबा व दहशत कित्येक वर्षे महाराष्ट्रात होती. देशपातळीवरील सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघात साखरवाडीच्या संघातील कमीत कमी दोन खेळाडू असतातच !

वीणा खोत – शेतीला ग्लॅमर (Veena Khot – Young Agricultural Graduate goes Back to...

0
दापोली तालुक्यातील देरदे या छोट्याशा गावातील युवा कृषी पदवीधर वीणा गजानन खोत तिच्या कुटुंबासमवेत फळपिकांचा व्याप सांभाळते. विशेष म्हणजे ती फळपिकांबरोबर शेत शिवारातील जैवविविधता जपण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न करते. ती पीक व्यवस्थापनात कृषी विद्यापीठात शिकलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करते. तिने त्या पद्धतीने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस यांचे; तसेच, काही मसाला पिकांचे उत्पादन घेतले आहे...

ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा

4
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...

दापोलीतील पाखरपहाट

मी दापोलीत 1996 मध्ये स्थिरावलो. मी राहतो त्या दापोलीच्या ‘वडाचा कोंड-लालबाग’ परिसरातील पाखरांची संख्या व विविधता गेल्या पंचवीस वर्षांत कमी होत गेली आहे, कारण झाडांची संख्या कमी झाली आहे ! आमच्या सोसायटीच्या आवारातील शिवणीचे गारवा, सावली देणारे झाडही माझ्या विरोधाला न जुमानता पाडण्यात आले ! त्यामुळे मी कितीतरी पक्षी व त्यांचे स्वर यांना मुकलो...

देगावच्या विवेकवादी समाजसेविका: स्मिता जोशी

स्मिता जोशी या सर्वसामान्य शिक्षिकेने तळागाळातील वंचित आदिवासी समाजासाठी अठ्ठावीस वर्षे सातत्याने काम केले, ही त्यांची ओळख. त्यांनी 15 ऑगस्ट 1981 रोजी कर्जतजवळील कोंदिवडे या गावी ‘बांधिलकी’ ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यांनी ‘बांधिलकी’चे काम स्त्रीला शिक्षित करणे, तिचे वैचारिक प्रबोधन करणे व तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या त्रिसूत्रीवर उभे केले, स्थिर केले व फुलवले...

सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग

1
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...