Home Search

साहित्यिक - search results

If you're not happy with the results, please do another search

मराठी – अभिजात भाषा !

5
भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले. मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत...

आनंदप्रवासी रवींद्र पिंगे

3
रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला...

त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्याचे आध्यात्मिक मूल्य (Prof T V Sardeshmukh took criticism to spiritual...

त्र्यं.वि. सरदेशमुख यांची जन्मशताब्दी 2020 साली झाली. त्यांची मुख्य ओळख कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून आहे. त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. त्यांच्या साहित्यकृतीचा लेखक निशिकांत ठकार यांनी लेखस्वरूपात घेतलेला आढावा...

नीतिन वैद्य यांनी रचलेला त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा विचारकोश (T V Sardeshmukh’s world of...

सोलापूरचे नीतिन वैद्य यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक, ‘त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्य- संदर्भ साहित्य : सूची आणि चरित्रपट’ हे पुस्तक व दोन, ‘जवळिकीची सरोवरे’ हे पुस्तक. यांपैकी पहिले पुस्तक सूची वाङ्मयाचे आहे. त्यात सूचिकाराने स्वतः प्रास्ताविक जोडलेले आहे. त्यातून, सूचिकाराने सरदेशमुख यांच्या साहित्याचा शोध कसा घेतला, त्यास कोठे कोठे हिंडावे-फिरावे लागले, आर्जवे-मिनतवाऱ्या कराव्या लागल्या या शोधाची मन पिळवटून टाकणारी कहाणी आहे. त्याने स्वतःच्या शारीरिक मर्यादांची तमा न बाळगता केलेली ती धडपड थक्क करणारी आहे ...

दक्षिण सोलापुरातील शिवक्षेत्रे- सोमेश्वर, संगमेश्वर, रामलिंगेश्वर, शंभू महादेव, नागनाथ

शिवक्षेत्रे दक्षिण भारतात, खास करून महाराष्ट्रात अधिक पाहण्यास मिळतात. धारणा अशी आहे, की जेथे जेथे शिवलिंगांची स्थापना झालेली आहे ती सर्व क्षेत्रे संवेदनशील भूभागावर वसलेली आहेत. म्हणजे ज्वालामुखीची तोंडे किंवा भूकंपप्रवण क्षेत्रे. शिवमंदिरातील शांत गंभीरता भक्तांना शिवाच्या चरणी लीन होण्यास भाग पाडण्याइतकी प्रभावी असते. सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात मागील एक हजार वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक वारसा जपून शिल्लक राहिलेला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणजे तेथील आगळीवेगळी शिवतीर्थे...

उदयन वाजपेयींची संवादयात्रा- शम्सुर्रहमान फारूकी (Udayan Vajpayee Interviews: Shamsur Rahman Faruqi)

उदयन वाजपेयी हे हिंदीमधील आघाडीचे लेखक. त्यांनी त्यांच्या दीर्घ लेखन कारकिर्दीत कथा, कविता, कादंबरी, प्रवासवृत्तांत-समीक्षात्मक निबंध, अनुवाद असे अनेकविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी स्वत:च्या लेखनाबरोबरच समकालीन प्रतिभावंतांचे विचारविश्व जाणून घेण्याच्या उद्देशाने काही दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्या मुलाखतींपैकी शम्सुर्रहमान फारूकी यांच्या मुलाखतीविषयी परिचयात्मक लेख निरंतर वाचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नितीन वैद्य यांनी लिहिला आहे...

गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती (Borrowing Gazal Ideas)

‘गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती’ हे लेखाचे नाव थोडे विचित्र वाटू शकेल. प्रत्येक भाषेची स्वत:ची संस्कृती असते. उर्दूमध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या कवी/शायर यांच्या गझलमधल्या ओळी घेऊन त्यापुढे स्वतःच्या ओळी जोडण्याची सर्रास पद्धत आहे. यात वाङ्मयचौर्य वगैरे न समजता ही ज्येष्ठ कवीला दिलेली मानवंदना आहे असे समजतात. हिंदीतले प्रसिद्ध कवी आणि सिनेगीतकार देवमणी पांडेय यांच्या ह्या लेखाचे मराठी कवयित्री रेखा शहाणे यांनी भाषांतर केले आहे. अनेक सुप्रसिद्ध गझल आणि गीतांमधील देवमणी पांडेय यांनी दाखवून दिलेले साम्य मननीय आहे...

कवितेचा जागल्या ! (A Tribute to Dr. M. S. Patil)

1
डॉ. म.सु. पाटील हे 1980 नंतरच्या मराठी समीक्षकांमधले अग्रगण्य नाव. ते समीक्षक असण्याबरोबरच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. ते मनमाड महाविद्यालयाचे वीस वर्षे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते महाविद्यालय नावारूपाला आणले. त्यांनी मराठी साहित्याच्या नकाशावर अस्तित्वात नसलेल्या मनमाड या गावाला साहित्यिक चळवळीचे केंद्र बनवले. त्यांच्या तिथल्या वास्तव्यात विविध चर्चासत्रे, व्याख्याने, ‘अनुष्टुभ’ सारख्या दर्जेदार मासिकाची चळवळ असे मनमाडचे साहित्यजीवन विविध अंगांनी बहरले. अनेक नामवंत साहित्यिकांचा राबता वाढला. त्यांचे निधन 31 मे 2019 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, कादंबरीकार नीरजा यांनी त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश प्रकाशित करत आहोत...

किरणची कविता पोचली जगामध्ये (Kiran’s Poetry Brings Funds to the Village)

किरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांच्या 'शनिखालची चिंच' या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला. ई-साहित्य प्रतिष्ठानने त्यांचे त्याच नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ते इंग्लंडमधील सुधीर बर्वे यांनी वाचले...

केकी मूस (Keki Moos)

4
आपल्या हयातीतच दंतकथा बनण्याचे भाग्य फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येते. जागतिक कीर्तीचे चित्रकार आणि छायाचित्रकार केकी मूस यांच्या वाट्याला हे भाग्य आले. महाराष्ट्रातच नव्हे...